शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

#Me too : एम. जे. अकबर यांना कोर्टाचा झटका, प्रिया रमानींची निर्दोष मुक्तता

By महेश गलांडे | Updated: February 17, 2021 16:12 IST

एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट रवींद्र कुमार पांडे यांनी दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत एका ओपन न्यायालयात हा निर्णय दिला. लैंगिक शोषण हे महिलांचा आत्मसन्मान आमि आत्मविश्वास दोन्हीला नष्ट करते, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

ठळक मुद्देअकबर यांच्यावर तब्बल 15 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानं अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. प्रिया रमानी यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच गहजब उडाला होता

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमानी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. एम.जे. अकबर यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार रमानी यांनी दिली होती. त्यानंतर, अकबर यांनी रमानी यांनाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. याप्रकरणी दिल्लीन्यायालयाने आज निकाल दिला. दिल्ली न्यायालयाने पत्रकार प्रिया रमानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे, अकबर यांना न्यायालयने मोठा झटका दिल्याचे दिसून येते. 

एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट रवींद्र कुमार पांडे यांनी दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत एका ओपन न्यायालयात हा निर्णय दिला. लैंगिक शोषण हे महिलांचा आत्मसन्मान आमि आत्मविश्वास दोन्हीला नष्ट करते, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे, महिलांकडे दशकांनंतरही आपली तक्रार करण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने म्हटले. दरम्यान, २०१८ साली सुरू झालेल्या 'मी टू' या ऑनलाईन मोहिमेवेळी पत्रकार प्रिया रमानी यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यामुळे एम जे अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. त्यामुळे चिडलेल्या अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. आज (बुधवारी) याच प्रकरणात निकाल देताना दिल्ली न्यायालयानं एम जे अकबर यांचे आरोप फेटाळताना प्रिया रमानी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवण्यास नकार दिलाय.

अकबर यांच्यावर तब्बल 15 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानं अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. प्रिया रमानी यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच गहजब उडाला होता. त्यामुळे १७ ऑक्टोबर २०१८ रोजी एम जे अकबर यांना आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०१८ रोजी अकबर यांनी प्रिया रमानींविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयdelhiदिल्लीM J Akbarएम. जे. अकबर