शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

MBA पास व्यक्तीने 17 लाखांचं पॅकेज सोडून सुरू केली गुलाबाची शेती; आता करतो बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 14:33 IST

5 वर्षांपूर्वी कपिल यांनी मुंबई सोडली आणि घरी परतले आणि गुलाबाची लागवड करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी असलेल्या कपिल जैन यांनी पुण्यातून एमबीए केले आणि त्यानंतर ते एशियन पेंट्स या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करू लागले. त्यांचे वार्षिक पॅकेज 17 लाख रुपये होते. 5 वर्षांपूर्वी कपिल यांनी मुंबई सोडली आणि घरी परतले आणि गुलाबाची लागवड करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. 38 वर्षीय कपिल कोटा येथील महावीर नगरमध्ये राहतात. त्यांच्या गावाचे नाव बनियावी असून तेथे त्यांचे वडील शेती करायचे. 

कपिल यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. कपिल यांनी गावात राहून दहावीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी कोटा येथून 12वी उत्तीर्ण केली आणि जयपूरला जाऊन पदवी मिळवली. 2006 मध्ये कपिल यांनी एमबीए केले. याच दरम्यान कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये कपिल यांना एशियन पेंट्स कंपनीत मार्केटिंग मॅनेजरची नोकरी मिळाली. 2012 मध्ये कपिल जैन यांचे लग्न झाले आणि ते कुटुंबासह मुंबईत राहू लागले. जेव्हा त्यांच्या पत्नीला कोटाच्या ग्रामीण बँकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनी 2018 मध्ये मुंबई सोडली आणि कोटा येथे राहू लागले.

कपिल यांच्या कुटुंबाकडे कोटामध्ये जमीन होती. कपिल यांनी सांगितले की, गाव बनियावी शहरापासून 35 किलोमीटर दूर आहे. ते रोज त्यांच्या शेतात जाऊन काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असे. यात त्यांच्या एका नातेवाईकाने मदत केली. कपिल यांना शेती करायची होती, पण त्यांच्या काकांनी सांगितले की, शेतीत पीक बिघडण्याची शक्यता आहे. म्हणूनच असे काहीतरी करा ज्यामध्ये पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाही. काकांकडून प्रेरणा घेऊन कपिल यांनी गुलाब जलचा प्लांट लावण्याची योजना आखली. 

2018 मध्ये कपिल यांनी कोटा येथेच भाड्याच्या कारखान्यात गुलाब जलचा प्लांट लावला. त्यासाठी शेतकऱ्यांकडून गुलाब विकत घेऊन पाणी तयार करायचे. मात्र लग्नसराईच्या काळात गुलाबाचे दर वाढायचे, त्यामुळे त्यांचे नुकसान होते. यानंतर कपिल यांना आपल्या शेतात गुलाबाची लागवड करण्याचा प्लॅन केला. 2019 मध्ये कपिल यांनी गुलाबाची लागवड सुरू केली. त्यांची वार्षिक उलाढाल 15 लाख रुपये आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी