शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Arvind Kejriwal : "मी जगातला सर्वात स्वीट दहशतवादी", अरविंद केजरीवालांकडून विरोधकांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 14:35 IST

Arvind Kejriwal : कुमार विश्वास यांच्याबद्दल अरविंद केजरीवाल म्हणाले की, ते हास्यकवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्याची पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी गंभीर दखल घेतली होती.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कवी आणि माजी आप नेते कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. कुमार विश्वास यांच्याबद्दल अरविंद केजरीवाल म्हणाले की, ते हास्यकवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्याची पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी गंभीर दखल घेतली होती.

अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मोदीजी, प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सगळेच म्हणत आहेत की, गेल्या 10 वर्षांपासून केजरीवाल देशाचे दोन तुकडे करण्याचा विचार करत आहेत आणि त्यांना एका तुकड्याचे पंतप्रधान व्हायचे आहे. हे होऊ शकते का? हा विनोद आहे, याचा अर्थ मी मोठा दहशतवादी झालो आहे. 10 वर्षात 3 वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते, 7 वर्षे भाजपचे सरकार होते. इतक्या वर्षांत त्यांनी मला अटक का केली नाही? त्यांची सुरक्षा एजन्सी काय करत होती आणि हे लोक झोपले होते का?' असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.

शाळा, हॉस्पिटल (School, Hospital) बांधणारा मी जगातला सर्वात गोड दहशतवादी आहे आणि असा दहशतवादी जगात कधीच जन्माला आला नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. तसेच,  सर्वात आधी मला राहुल गांधींनी दहशतवादी म्हटले, पण लोक त्यांना गंभीर मानत नसल्याने लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रियंका गांधी आणि सुखबीर सिंग बादल यांनीही हीच भाषा वापरली. मात्र, पंतप्रधानही राहुल गांधींची नक्कल करतील, असे वाटले नव्हते, असे लोक आज म्हणत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी विरोधकांवर केली. 

'सर्व पक्षांनी पंजाब लुटला'याचबरोबर, अरविंद केजरीवाल म्हणाले, 'पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. 70 वर्षांपासून सर्वच पक्षांनी पंजाबला लुटले, मुलांना बेरोजगार केले. ते पुढे म्हणाले, 'पंजाबवर 3 लाख कोटींचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. त्यांनी काही केले नाही तर हा पैसा गेला कुठे? शाळा बांधली नाही, दवाखाना बांधला नाही, कॉलेज बनवले नाही, काम केले नाही.

'दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये काम करू'दिल्लीत चांगल्या शाळा आणि रुग्णालये बांधली पाहिजेत, असे आम्ही म्हणत आहोत. आमचे सरकार बनले तर आम्ही पंजाबमध्येही बनवू. दिल्लीतील 10 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार आणले जाईल. संपूर्ण यंत्रणा आपल्या विरोधात उभी आहे. पंजाबचे 3 कोटी पंजाबी एकत्र येऊ शकत नाहीत का? ते कोणत्याही पक्षाचे असले तरी आपल्याला संपूर्ण व्यवस्थेचा पराभव करायचा आहे. यावेळी प्रामाणिक पंजाबला मतदान करा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना केले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२