शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal : "मी जगातला सर्वात स्वीट दहशतवादी", अरविंद केजरीवालांकडून विरोधकांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 14:35 IST

Arvind Kejriwal : कुमार विश्वास यांच्याबद्दल अरविंद केजरीवाल म्हणाले की, ते हास्यकवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्याची पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी गंभीर दखल घेतली होती.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कवी आणि माजी आप नेते कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. कुमार विश्वास यांच्याबद्दल अरविंद केजरीवाल म्हणाले की, ते हास्यकवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्याची पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी गंभीर दखल घेतली होती.

अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मोदीजी, प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सगळेच म्हणत आहेत की, गेल्या 10 वर्षांपासून केजरीवाल देशाचे दोन तुकडे करण्याचा विचार करत आहेत आणि त्यांना एका तुकड्याचे पंतप्रधान व्हायचे आहे. हे होऊ शकते का? हा विनोद आहे, याचा अर्थ मी मोठा दहशतवादी झालो आहे. 10 वर्षात 3 वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते, 7 वर्षे भाजपचे सरकार होते. इतक्या वर्षांत त्यांनी मला अटक का केली नाही? त्यांची सुरक्षा एजन्सी काय करत होती आणि हे लोक झोपले होते का?' असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.

शाळा, हॉस्पिटल (School, Hospital) बांधणारा मी जगातला सर्वात गोड दहशतवादी आहे आणि असा दहशतवादी जगात कधीच जन्माला आला नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. तसेच,  सर्वात आधी मला राहुल गांधींनी दहशतवादी म्हटले, पण लोक त्यांना गंभीर मानत नसल्याने लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रियंका गांधी आणि सुखबीर सिंग बादल यांनीही हीच भाषा वापरली. मात्र, पंतप्रधानही राहुल गांधींची नक्कल करतील, असे वाटले नव्हते, असे लोक आज म्हणत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी विरोधकांवर केली. 

'सर्व पक्षांनी पंजाब लुटला'याचबरोबर, अरविंद केजरीवाल म्हणाले, 'पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. 70 वर्षांपासून सर्वच पक्षांनी पंजाबला लुटले, मुलांना बेरोजगार केले. ते पुढे म्हणाले, 'पंजाबवर 3 लाख कोटींचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. त्यांनी काही केले नाही तर हा पैसा गेला कुठे? शाळा बांधली नाही, दवाखाना बांधला नाही, कॉलेज बनवले नाही, काम केले नाही.

'दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये काम करू'दिल्लीत चांगल्या शाळा आणि रुग्णालये बांधली पाहिजेत, असे आम्ही म्हणत आहोत. आमचे सरकार बनले तर आम्ही पंजाबमध्येही बनवू. दिल्लीतील 10 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार आणले जाईल. संपूर्ण यंत्रणा आपल्या विरोधात उभी आहे. पंजाबचे 3 कोटी पंजाबी एकत्र येऊ शकत नाहीत का? ते कोणत्याही पक्षाचे असले तरी आपल्याला संपूर्ण व्यवस्थेचा पराभव करायचा आहे. यावेळी प्रामाणिक पंजाबला मतदान करा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना केले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२