शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काँग्रेसने दलितांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 'बसपा'ची स्थापना, मायावतींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 17:49 IST

मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेसच्या 'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅलीवर निशाणा साधत मायावती यांनी काँग्रेसला सत्तेत असतेवेळी जनतेचे हित का लक्षात आले नाही, असा सवाल केला. तसेच, दुसऱ्यांची चिंता करण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या स्थितीवर आत्मचिंतन केले  तर चांगले होईल, असा टोलाही मायावती यांनी लगावला. 

मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाला, "काँग्रेस आपला स्थापना दिवस 'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅलीच्या माध्यमातून साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांची चिंता व्यक्त करण्यापेक्षा काँग्रेसने स्वत: आपल्या स्थितीवर आत्म-चिंतन केले असते तर चांगले झाले असते. त्यातून बाहेर पडायला काँग्रेसला आता वेगवेगळी नाटकबाजी करावी लागत आहे."

दुसऱ्या ट्विटमध्ये मायावती म्हणाल्या, "ज्यावेळी दलित, मागास आणि मुस्लिमांना संवैधानिक हक्क मिळत नव्हता. त्यावेळी काँग्रेसला 'भारत बचाओ-संविधान बचाओ'ची आठवण का आली नाही. सत्तेत असताना काँग्रेस याकडे कानाडोळा करत होती म्हणून बहुजन समाज पार्टीची स्थापना करावी लागली. त्यामुळे आज भाजपा सत्तेत आहे."

दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्लाबोल केला. तसेच, नाव न घेता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर या विरोधी पक्षांवरही  निशाणा साधला. उत्तर प्रदेशात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून इतर विरोधी पक्ष काहीच करत नाहीत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे आपल्यालाच सीएए आणि एनआरसीच्या विरोधात लढावे लागणार आहे. आम्ही कोणालाही घाबरणार नाही, असे सांगत प्रियंका गांधी यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर टीका केली.  

दिल्लीसह देशभरात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना काँग्रेसने पाठिंबा जाहिर केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यघटना वाचविण्याकरिता जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने पक्षाच्या स्थापनादिनी देशभरात मोर्चे काढायचे ठरविले. या कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी सध्या निदर्शने सुरू आहेत.

टॅग्स :mayawatiमायावतीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस