शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ती बाब सुशील कुमार मोदींना पडली भारी, उपमुख्यमंत्रिपदावर सोडावे लागले पाणी

By बाळकृष्ण परब | Updated: November 15, 2020 20:26 IST

Sushil Kumar Modi News : गेली अनेक वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने काट मारली आहे.

ठळक मुद्देबिहारमधील उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहेअनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या सुशील कुमार मोदी यांची उचलबांगडी होणार असल्याचे निश्चित झाले आहेनितीश कुमार यांच्यासोबत असलेली मैत्रीच सुशील कुमार मोदी यांना भारी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे

पाटणा - बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी नितीश कुमार नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपदासाठी बिहार भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात गेली अनेक वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने काट मारली असून, आता उपमुख्यमंत्रिपदासाठी अन्य नेत्यांची नावे समोर येत आहेत. दरम्यान, सुशील कुमार मोदी यांचे उपमुख्यमंत्रिपद जाण्यामागचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे.बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील असे भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्याचवेळी राज्यातील उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या सुशील कुमार मोदी यांची उचलबांगडी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. स्वत: सुशील कुमार मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म समोरून उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे. आता नितीश कुमार यांच्यासोबत असलेली मैत्रीच सुशील कुमार मोदी यांना भारी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुशील कुमार मोदी यांनी बिहारमध्ये भाजपाला नितीश कुमार यांची मांडलिक बनवल्याचा अनेक विश्लेषकांचे म्हणणे होते.नितीश कुमार आणि सुशील कुमार मोदी यांची जोडी जगजाहीर होती. जेडीयूच्या नेत्यांपेक्षा सुशील कुमार मोदी हेच नितीश कुमार यांचा अधिक बचाव करत असत. त्यामुळेच १५ वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात नितीश कुमार आणि सुशील कुमार मोदी यांना सरकार चालवताना कधीच कुठली अडचण आली नव्हती. मात्र २०१२ मध्ये सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या एका विधानामुळे ही जोडी खटकली होती. त्यावेळी सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमार यांचा उल्लेख पीएम मटेरियल असा केला होता. मात्र त्याच वेळी बिहार भाजपामधील अन्य नेते हे नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा देत होते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामधून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी होत होती. गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून नितीश कुमार यांचा प्रश्न सातत्याने नरेंद्र मोदींचा विरोध करत होता. तर भाजपाचे गिरिराज सिंह यांच्यासारखे नेते मोदींना पाठिंबा देत होते. अश्विनी चौबेसुद्धा मोदींचे नाव पुढे रेटत होते. मात्र त्याचवेळी २०१२ मधील एका मुलाखतीत नीतीश कुमार पीएम मटेरियल असल्याचे म्हटले होते.मात्र सुशील कुमार मोदी यांचे हे विधान भाजपा्च्या पक्ष नेतृत्वाला आवडली नव्हती. अशा परिस्थितीत तेव्हा केलेल्या चुकीचा फटका सुशील कुमार मोदी यांना आता बसला आहे का, अशी चर्चा आता बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.दरम्यान, सुशील कुमार मोदी यांच्याबाबत केंद्रात मंत्रिमंडळामध्ये असलेले नेतेही नाराज होते. कारण सुशील कुमार मोदी हे नितीश कुमार यांच्या बचावासाठी सातत्याने पुढे येत असत. गेल्या १५ वर्षांपासून भाजपा बिहारमध्ये सत्तेत असला तरी भाजपा नितीश कुमार यांच्या छत्रछायेतून बाहेर पडत नव्हता. मा्त्र यावेळी भाजपा बिहारमध्ये मोठा पक्ष ठरला आहे, अशा परिस्थितीत भाजपाकडे सरकारमध्ये वरचष्मा राखण्याची संधी आहे.

 

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण