शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

ती बाब सुशील कुमार मोदींना पडली भारी, उपमुख्यमंत्रिपदावर सोडावे लागले पाणी

By बाळकृष्ण परब | Updated: November 15, 2020 20:26 IST

Sushil Kumar Modi News : गेली अनेक वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने काट मारली आहे.

ठळक मुद्देबिहारमधील उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहेअनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या सुशील कुमार मोदी यांची उचलबांगडी होणार असल्याचे निश्चित झाले आहेनितीश कुमार यांच्यासोबत असलेली मैत्रीच सुशील कुमार मोदी यांना भारी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे

पाटणा - बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी नितीश कुमार नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपदासाठी बिहार भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात गेली अनेक वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने काट मारली असून, आता उपमुख्यमंत्रिपदासाठी अन्य नेत्यांची नावे समोर येत आहेत. दरम्यान, सुशील कुमार मोदी यांचे उपमुख्यमंत्रिपद जाण्यामागचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे.बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील असे भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्याचवेळी राज्यातील उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या सुशील कुमार मोदी यांची उचलबांगडी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. स्वत: सुशील कुमार मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म समोरून उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे. आता नितीश कुमार यांच्यासोबत असलेली मैत्रीच सुशील कुमार मोदी यांना भारी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुशील कुमार मोदी यांनी बिहारमध्ये भाजपाला नितीश कुमार यांची मांडलिक बनवल्याचा अनेक विश्लेषकांचे म्हणणे होते.नितीश कुमार आणि सुशील कुमार मोदी यांची जोडी जगजाहीर होती. जेडीयूच्या नेत्यांपेक्षा सुशील कुमार मोदी हेच नितीश कुमार यांचा अधिक बचाव करत असत. त्यामुळेच १५ वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात नितीश कुमार आणि सुशील कुमार मोदी यांना सरकार चालवताना कधीच कुठली अडचण आली नव्हती. मात्र २०१२ मध्ये सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या एका विधानामुळे ही जोडी खटकली होती. त्यावेळी सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमार यांचा उल्लेख पीएम मटेरियल असा केला होता. मात्र त्याच वेळी बिहार भाजपामधील अन्य नेते हे नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा देत होते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामधून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी होत होती. गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून नितीश कुमार यांचा प्रश्न सातत्याने नरेंद्र मोदींचा विरोध करत होता. तर भाजपाचे गिरिराज सिंह यांच्यासारखे नेते मोदींना पाठिंबा देत होते. अश्विनी चौबेसुद्धा मोदींचे नाव पुढे रेटत होते. मात्र त्याचवेळी २०१२ मधील एका मुलाखतीत नीतीश कुमार पीएम मटेरियल असल्याचे म्हटले होते.मात्र सुशील कुमार मोदी यांचे हे विधान भाजपा्च्या पक्ष नेतृत्वाला आवडली नव्हती. अशा परिस्थितीत तेव्हा केलेल्या चुकीचा फटका सुशील कुमार मोदी यांना आता बसला आहे का, अशी चर्चा आता बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.दरम्यान, सुशील कुमार मोदी यांच्याबाबत केंद्रात मंत्रिमंडळामध्ये असलेले नेतेही नाराज होते. कारण सुशील कुमार मोदी हे नितीश कुमार यांच्या बचावासाठी सातत्याने पुढे येत असत. गेल्या १५ वर्षांपासून भाजपा बिहारमध्ये सत्तेत असला तरी भाजपा नितीश कुमार यांच्या छत्रछायेतून बाहेर पडत नव्हता. मा्त्र यावेळी भाजपा बिहारमध्ये मोठा पक्ष ठरला आहे, अशा परिस्थितीत भाजपाकडे सरकारमध्ये वरचष्मा राखण्याची संधी आहे.

 

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण