शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

गलवानमध्ये ४ नव्हे, ३८ चिनी सैनिकांचा मृत्यू; भारतीय जवानांसोबतचा पंगा महागात पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 09:28 IST

चीनचा खोटारडेपणा पुन्हा उघड; चीन सरकारच्या दाव्यांची पुराव्यांसहीत चिरफाड

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये भारत आणि चीनचे सैनिक भिडले. या रक्तरंजित संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं. मात्र चीननं मृत सैनिकांचा आकडा कायम लपवला. आता या प्रकरणात ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. हिंसक झटापट सुरू असताना चीनचे ३८ सैनिक वाहून गेल्याचं वृत्त 'द क्लॅक्सन' वृत्तपत्रानं दिलं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत केवळ ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचं याआधी चीन सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र हा दावा 'द क्लॅक्सन'नं खोडून काढला आहे.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र 'द क्लॅक्सन'नं 'गलवान डिकोडेड' नावानं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. स्वतंत्र सोशल मीडिया संशोधकांच्या टीमनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गलवान खोऱ्यात भारतीय जवानांसोबत झालेल्या झटापटीत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) अनेक जवान गलवान नदीत वाहून गेले होते अशी खळबळजनक माहिती 'द क्लॅक्सन'नं प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे चीनचं पितळ उघडं पडलं आहे.

गलवानमध्ये रात्रीच्या सुमारास झटापट झाली. त्यावेळी चीनचे कमीत कमी ३८ सैनिक नदीत बुडाले, असा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo च्या हवाल्यानं करण्यात आला आहे. गलवानमधील संघर्षात केवळ ४ सैनिक मारले गेल्याचा दावा चीन सरकारनं केला होता. 'त्या रात्री नेमकं काय घडलं, कोणत्या कारणामुळे झटापट झाली, संघर्ष पेटला, याबद्दलची सगळीच माहिती चीनकडून लपवण्यात आली. चीननं जगाला धादांत खोटी माहिती दिली. चिनी अधिकाऱ्यांनी अनेक ब्लॉग्स आणि पेजेस डिलीट केले. मात्र चीनमधून मिळालेल्या डिजिटल अर्काईव्हमधून वेगळाच तपशील पुढे आला आहे', असं 'द क्लॅक्सन'नं वृत्तात म्हटलं आहे.

गलवानमध्ये जून २०२० मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. ४ दशकात पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष झाला. यामध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांचा आकडा चीननं सातत्यानं लपवला. मात्र गेल्या फेब्रुवारीत चीननं आपल्या चार सैनिकांना मरणोत्तर सन्मान दिला. गलवानमध्ये ४ सैनिक मारले गेल्याचं चीननं कबूल केल्याचं ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं म्हटलं आहे. भारतीय हद्दीत चीननं बांधकाम सुरू केल्यानं भारतीय जवानांनी गलवान नदीच्या एका किनाऱ्यावर अस्थायी पुलाची बांधणी सुरू केली. त्यावरून भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव