शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शहीद होण्यापूर्वी अधिकाऱ्याने काश्मीरमध्ये फडकावला तिरंगा

By admin | Updated: August 17, 2016 04:40 IST

स्वातंत्र्यदिनानिमित्त केवढा तो उत्साह... श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविताना केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडिंग आॅफिसर प्रमोद कुमार यांची छाती

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त केवढा तो उत्साह... श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविताना केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडिंग आॅफिसर प्रमोद कुमार यांची छाती अभिमानाने भरून आली होती. ‘आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे’ हेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले. कारण, झेंडावंदनांनंतर ते एका आॅपरेशनसाठी रवाना झाले आणि अतिरेक्यांशी लढताना झारखंडचा हा वीरपुत्र शहीद झाला. तत्पूर्वी दोन अतिरेक्यांचा खात्मा करुन कुमार यांनी आपले कर्तव्यही पूर्ण केले. प्रमोद कुमार यांना जुलै महिन्यातच बढती मिळाली होती आणि त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली होणार होती. बदली न झाल्यामुळे ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. बदली वेळेत झाली असती, तर ते नक्कीच बचावले असते. त्यांच्या मुलीचा कालच वाढदिवस होता. त्यांच्या पत्नी नेहा यांच्या सांगण्यानुसार प्रमोद कुमार व नेहा यांचे काल सकाळी मोबाइलवर संभाषण झाले होते. आपण कामात व्यग्र आहोत, नंतर फोन करतो, असे ते पत्नीला म्हणाले होते. पुन्हा पत्नीने फोन केला, तेव्हा त्याच्या मोबाइलची बेल वाजत होती. पण मोबाइल बराच वेळ उचलला गेला नाही. त्यामुळे नेहा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधला, तेव्हा ते किरकोळ जखमी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुन्हा काही तासांनी फोन केला, तेव्हा त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असल्याची बातमी कळली. पण शस्त्रक्रियेनंतरही ते जगू शकले नाहीत.४४ वर्षीय कुमार यांनी सकाळी ८.३० च्या सुमारास झेंडा फडकावला. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापनदिनी सुरक्षा दलाची जबाबदारी वाढली आहे, असेही ते आपल्या या शेवटच्या भाषणात म्हणाले. १९९८ मध्ये ते नोकरीत रुजू झाले होते. सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलात कमांडिंग आॅफिसर म्हणून कार्यरत होते. दरम्यान, झेंडावंदनानंतर नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, नौहट्टा भागात अतिरेकी घुसले आहेत. ते तात्काळ एका बुलेटप्रूफ वाहनातून मोहिमेवर रवाना झाले. यावेळी त्यांचे काही सहकारीही सोबत होते. नौहट्टा भागात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या मानेच्या वरच्या बाजूला गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. कुमार यांच्या पश्चात पत्नी नेहा आणि सातवर्षीय मुलगी आर्ना असा परिवार आहे. २०११, २०१४ आणि २०१५ मध्ये ‘सीआरएफकडून’ कुमार यांना विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. या चकमकीत अन्य नऊ जवान जखमी झाले आहेत. झारखंडच्या जमताडा जिल्ह्यात कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.