शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

शहीद होण्यापूर्वी अधिकाऱ्याने काश्मीरमध्ये फडकावला तिरंगा

By admin | Updated: August 17, 2016 04:40 IST

स्वातंत्र्यदिनानिमित्त केवढा तो उत्साह... श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविताना केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडिंग आॅफिसर प्रमोद कुमार यांची छाती

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त केवढा तो उत्साह... श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविताना केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडिंग आॅफिसर प्रमोद कुमार यांची छाती अभिमानाने भरून आली होती. ‘आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे’ हेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले. कारण, झेंडावंदनांनंतर ते एका आॅपरेशनसाठी रवाना झाले आणि अतिरेक्यांशी लढताना झारखंडचा हा वीरपुत्र शहीद झाला. तत्पूर्वी दोन अतिरेक्यांचा खात्मा करुन कुमार यांनी आपले कर्तव्यही पूर्ण केले. प्रमोद कुमार यांना जुलै महिन्यातच बढती मिळाली होती आणि त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली होणार होती. बदली न झाल्यामुळे ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. बदली वेळेत झाली असती, तर ते नक्कीच बचावले असते. त्यांच्या मुलीचा कालच वाढदिवस होता. त्यांच्या पत्नी नेहा यांच्या सांगण्यानुसार प्रमोद कुमार व नेहा यांचे काल सकाळी मोबाइलवर संभाषण झाले होते. आपण कामात व्यग्र आहोत, नंतर फोन करतो, असे ते पत्नीला म्हणाले होते. पुन्हा पत्नीने फोन केला, तेव्हा त्याच्या मोबाइलची बेल वाजत होती. पण मोबाइल बराच वेळ उचलला गेला नाही. त्यामुळे नेहा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधला, तेव्हा ते किरकोळ जखमी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुन्हा काही तासांनी फोन केला, तेव्हा त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असल्याची बातमी कळली. पण शस्त्रक्रियेनंतरही ते जगू शकले नाहीत.४४ वर्षीय कुमार यांनी सकाळी ८.३० च्या सुमारास झेंडा फडकावला. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापनदिनी सुरक्षा दलाची जबाबदारी वाढली आहे, असेही ते आपल्या या शेवटच्या भाषणात म्हणाले. १९९८ मध्ये ते नोकरीत रुजू झाले होते. सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलात कमांडिंग आॅफिसर म्हणून कार्यरत होते. दरम्यान, झेंडावंदनानंतर नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, नौहट्टा भागात अतिरेकी घुसले आहेत. ते तात्काळ एका बुलेटप्रूफ वाहनातून मोहिमेवर रवाना झाले. यावेळी त्यांचे काही सहकारीही सोबत होते. नौहट्टा भागात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या मानेच्या वरच्या बाजूला गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. कुमार यांच्या पश्चात पत्नी नेहा आणि सातवर्षीय मुलगी आर्ना असा परिवार आहे. २०११, २०१४ आणि २०१५ मध्ये ‘सीआरएफकडून’ कुमार यांना विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. या चकमकीत अन्य नऊ जवान जखमी झाले आहेत. झारखंडच्या जमताडा जिल्ह्यात कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.