शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

तीन जवानांचे बलिदान; जम्मूमध्ये लष्करी छावणीत घुसू पाहणाऱ्या २ अतिरेक्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 06:11 IST

रोखला आत्मघाती हल्ला

जम्मू : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील एका लष्करी छावणीवर दोन दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री उशिरा आत्मघाती हल्ला केला. यात तीन जवान शहीद झाले. यावेळी उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही चकमक चार तास चालली, अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही आत्मघाती हल्लेखोर जैश ए मोहंमद संघटनेचे असल्याची शक्यता आहे. त्यांनी छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. सतर्क सुरक्षा जवानांनी त्यांना कंठस्नान घातले.

परघाल येथील लष्करी छावणी दहशतवाद्यांचे लक्ष्य होती. छावणीच्या पहारेकरी सैनिकांना काही लोक खराब हवामान व झाडीच्या दाट पर्णसंभाराचा गैरफायदा घेत चौकीकडे येत असल्याचे दिसले, असे लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले. सतर्क पहारेकरी सैनिकांनी या दहशतवाद्यांना आव्हान दिले. छावणीत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. सतर्क जवानांनी तत्काळ नाकेबंदी करून त्यांना वेढा घातल्यानंतर चकमक उडाली. जवानांनी दोन्ही आत्मघाती हल्लेखोरांना कंठस्नान घातले. तथापि, आत्मघाती हल्ला परतवून लावताना सहा जवान जखमी झाले आणि त्यातील तिघांचा नंतर मृत्यू झाला, असे  ले. कर्नल आनंद म्हणाले. 

आत्मघाती हल्ल्यांचे पुनरागमन

पराघल येथील हल्ला जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात तीन वर्षांच्या खंडानंतर आत्मघाती हल्ल्याचे पुनरागमन झाल्याचे निदर्शक आहे. यापूर्वी शेवटचा आत्मघाती हल्ला १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा जिल्ह्यातील लेथरपुरा येथे झाला होता. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर खोऱ्यात एकही आत्मघाती हल्ला झाला नव्हता.

गुप्तचर माहितीमुळे सुरक्षा दले होती सतर्क 

राजौरी भागात दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दले व पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची दरहाल व नौशेरा भागात शोधमोहीम सुरू आहे. तत्पूर्वी २२ एप्रिल रोजी पंतप्रधान जम्मूला येणार होते. तेव्हाही जैश ए मोहंमदच्या दहशतवाद्यांनी जम्मूत आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

शूरवीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय लष्कर त्यांना सलाम करते. त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी व कर्तव्यनिष्ठेसाठी राष्ट्र त्यांचे सदैव ऋणी राहील.- ले. कर्नल आनंद 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी