शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

तीन जवानांचे बलिदान; जम्मूमध्ये लष्करी छावणीत घुसू पाहणाऱ्या २ अतिरेक्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 06:11 IST

रोखला आत्मघाती हल्ला

जम्मू : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील एका लष्करी छावणीवर दोन दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री उशिरा आत्मघाती हल्ला केला. यात तीन जवान शहीद झाले. यावेळी उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही चकमक चार तास चालली, अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही आत्मघाती हल्लेखोर जैश ए मोहंमद संघटनेचे असल्याची शक्यता आहे. त्यांनी छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. सतर्क सुरक्षा जवानांनी त्यांना कंठस्नान घातले.

परघाल येथील लष्करी छावणी दहशतवाद्यांचे लक्ष्य होती. छावणीच्या पहारेकरी सैनिकांना काही लोक खराब हवामान व झाडीच्या दाट पर्णसंभाराचा गैरफायदा घेत चौकीकडे येत असल्याचे दिसले, असे लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले. सतर्क पहारेकरी सैनिकांनी या दहशतवाद्यांना आव्हान दिले. छावणीत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. सतर्क जवानांनी तत्काळ नाकेबंदी करून त्यांना वेढा घातल्यानंतर चकमक उडाली. जवानांनी दोन्ही आत्मघाती हल्लेखोरांना कंठस्नान घातले. तथापि, आत्मघाती हल्ला परतवून लावताना सहा जवान जखमी झाले आणि त्यातील तिघांचा नंतर मृत्यू झाला, असे  ले. कर्नल आनंद म्हणाले. 

आत्मघाती हल्ल्यांचे पुनरागमन

पराघल येथील हल्ला जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात तीन वर्षांच्या खंडानंतर आत्मघाती हल्ल्याचे पुनरागमन झाल्याचे निदर्शक आहे. यापूर्वी शेवटचा आत्मघाती हल्ला १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा जिल्ह्यातील लेथरपुरा येथे झाला होता. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर खोऱ्यात एकही आत्मघाती हल्ला झाला नव्हता.

गुप्तचर माहितीमुळे सुरक्षा दले होती सतर्क 

राजौरी भागात दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दले व पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची दरहाल व नौशेरा भागात शोधमोहीम सुरू आहे. तत्पूर्वी २२ एप्रिल रोजी पंतप्रधान जम्मूला येणार होते. तेव्हाही जैश ए मोहंमदच्या दहशतवाद्यांनी जम्मूत आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

शूरवीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय लष्कर त्यांना सलाम करते. त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी व कर्तव्यनिष्ठेसाठी राष्ट्र त्यांचे सदैव ऋणी राहील.- ले. कर्नल आनंद 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी