शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए', फेसबुकवर लिहिलेलं ते वाक्य शहीद कपिल कुंडू यांनी खरं करुन दाखवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 11:46 IST

आयुष्याचा थोडक्यात अर्थ सांगणारा हा डायलॉग शहीद कपिल कुंडू यांना खरा करुन दाखवला आहे

नवी दिल्ली - राजेश खन्ना यांचा 'आनंद' चित्रपटातील सुपरहिट डायलॉग 'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए', आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आयुष्याचा थोडक्यात अर्थ सांगणारा हा डायलॉग शहीद कपिल कुंडू यांना खरा करुन दाखवला आहे. सीमारेषेवर शहीद झालेल्या 23 वर्षीय कॅप्टन कपिल कुंडू यांचं आयुष्य अगदी या डायलॉगप्रमाणेच होतं. जानेवारी महिन्यात कॅप्टन म्हणून तैनात करण्यात आलेले कपिल कुंडू यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या इंट्रोमध्येही हीच लाइन लिहिली होती. 

फेसबुकवर आपली ओळख लिहिताना अनेकजण एखाद्या चित्रपटातील डायलॉग चिकटवतात. पण शहीद कपिल कुंडू यांनी आनंद चित्रपटातील 'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए' हा डायलॉग फक्त लिहिला नाही, तर तो जगूनही दाखवला. फक्त 23 व्या वर्षी शहीद झालेल्या कपिल कुंडू यांचं आयुष्य फक्त 23 वर्षांचं राहिलं, पण देशासाठी शहीद होत ते मोठं काम करुन गेले आहेत ज्यामुळे पुढच्या अनेक पिढ्या त्यांचं नाव लक्षात ठेवलं जाईल. 

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासहित तीन जवान शहीद झाले. कॅप्टन कपिल कुंडू फक्त 23 वर्षांचे होते आणि गुरुग्रामजवळील रनसिका गावचे रहिवासी होते. आपल्या विधवा आईचा एकमेव आधारदेखील तेच होते. विशेष म्हणजे 10 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस होता. आधी पती आणि आता मुलगा गेल्यानंतर आयुष्यात कधी नव्हे ती पोकळी निर्माण झाली आहे. कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी केली आहे. 

गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली. राजौरी जिल्ह्यातील तारकुंडी व सुंदरबनी भागामध्ये रविवारी संध्याकाळपासून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा मारा करुन भारतीय लष्कराचे पूर्ण बंकर फोडले. कॅप्टन कपिल कुंडूदेखील गेल्या काही दिवसांपासून राजौरी येथे तैनात होते. कॅप्टन कपिल कुंडू यांना दोन मोठ्या बहिणी असून त्यांचं लग्न झालं आहे.

कॅप्टन कपिल कुंडू यांचं शिक्षण पटोदी जिल्ह्यातील डिव्हाइन डेल इंटरनॅशन स्कूलमध्ये झालं आहे. 2012 मध्ये एनडीएसाठी त्यांची निवड झाली, जिथून भारतीय लष्करासाठी ते निवडले गेले. लहानपणापासून त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली होती. ट्रेनिंगदरम्यानही त्यांचे हे देशप्रेम वारंवार दिसून यायचं. 

आजोबा म्हणतात आमचा एकुलता एक नातू गेला, आम्ही सगळंच गमावून बसलोशहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक आव्हान करताना म्हटलं की, 'आमचा नातू सीमेवर शहीद झाला याचा अभिमान आहे. तो आमचा एकुलता एक नातू होता, आम्ही सगळंच गमावून बसलोय. तुम्ही याचा बदला घेतला पाहिजे, फक्त दिलासा देऊन काम चालणार नाही'. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर