शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए', फेसबुकवर लिहिलेलं ते वाक्य शहीद कपिल कुंडू यांनी खरं करुन दाखवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 11:46 IST

आयुष्याचा थोडक्यात अर्थ सांगणारा हा डायलॉग शहीद कपिल कुंडू यांना खरा करुन दाखवला आहे

नवी दिल्ली - राजेश खन्ना यांचा 'आनंद' चित्रपटातील सुपरहिट डायलॉग 'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए', आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आयुष्याचा थोडक्यात अर्थ सांगणारा हा डायलॉग शहीद कपिल कुंडू यांना खरा करुन दाखवला आहे. सीमारेषेवर शहीद झालेल्या 23 वर्षीय कॅप्टन कपिल कुंडू यांचं आयुष्य अगदी या डायलॉगप्रमाणेच होतं. जानेवारी महिन्यात कॅप्टन म्हणून तैनात करण्यात आलेले कपिल कुंडू यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या इंट्रोमध्येही हीच लाइन लिहिली होती. 

फेसबुकवर आपली ओळख लिहिताना अनेकजण एखाद्या चित्रपटातील डायलॉग चिकटवतात. पण शहीद कपिल कुंडू यांनी आनंद चित्रपटातील 'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए' हा डायलॉग फक्त लिहिला नाही, तर तो जगूनही दाखवला. फक्त 23 व्या वर्षी शहीद झालेल्या कपिल कुंडू यांचं आयुष्य फक्त 23 वर्षांचं राहिलं, पण देशासाठी शहीद होत ते मोठं काम करुन गेले आहेत ज्यामुळे पुढच्या अनेक पिढ्या त्यांचं नाव लक्षात ठेवलं जाईल. 

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासहित तीन जवान शहीद झाले. कॅप्टन कपिल कुंडू फक्त 23 वर्षांचे होते आणि गुरुग्रामजवळील रनसिका गावचे रहिवासी होते. आपल्या विधवा आईचा एकमेव आधारदेखील तेच होते. विशेष म्हणजे 10 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस होता. आधी पती आणि आता मुलगा गेल्यानंतर आयुष्यात कधी नव्हे ती पोकळी निर्माण झाली आहे. कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी केली आहे. 

गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली. राजौरी जिल्ह्यातील तारकुंडी व सुंदरबनी भागामध्ये रविवारी संध्याकाळपासून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा मारा करुन भारतीय लष्कराचे पूर्ण बंकर फोडले. कॅप्टन कपिल कुंडूदेखील गेल्या काही दिवसांपासून राजौरी येथे तैनात होते. कॅप्टन कपिल कुंडू यांना दोन मोठ्या बहिणी असून त्यांचं लग्न झालं आहे.

कॅप्टन कपिल कुंडू यांचं शिक्षण पटोदी जिल्ह्यातील डिव्हाइन डेल इंटरनॅशन स्कूलमध्ये झालं आहे. 2012 मध्ये एनडीएसाठी त्यांची निवड झाली, जिथून भारतीय लष्करासाठी ते निवडले गेले. लहानपणापासून त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली होती. ट्रेनिंगदरम्यानही त्यांचे हे देशप्रेम वारंवार दिसून यायचं. 

आजोबा म्हणतात आमचा एकुलता एक नातू गेला, आम्ही सगळंच गमावून बसलोशहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक आव्हान करताना म्हटलं की, 'आमचा नातू सीमेवर शहीद झाला याचा अभिमान आहे. तो आमचा एकुलता एक नातू होता, आम्ही सगळंच गमावून बसलोय. तुम्ही याचा बदला घेतला पाहिजे, फक्त दिलासा देऊन काम चालणार नाही'. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर