शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

"सर्व पैसे घेऊन स्मृतीला ऑस्ट्रेलियाला पळून जायचंय"; शहीद अंशुमनच्या वडिलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 15:47 IST

अंशुमन यांच्या आई-वडिलांनी सुनेवर गंभीर आरोप केले आहेत.

शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अंशुमन यांच्या आई-वडिलांनी सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. स्मृतीने त्यांच्या मुलासोबत प्रेमाचा सौदा केला आहे. तिला सर्व पैसा आणि प्रसिद्धी घेऊन ऑस्ट्रेलियाला पळून जायचं आहे असं एबीपी न्यूजशी संवाद साधताना अंशुमन यांनी म्हटलं आहे.

शहीद अंशुमन सिंह यांच्या वडिलांनी सांगितलं की, "स्मृतीने आपल्या मुलाशी प्रेमाचा सौदा केला आहे. तिचं माझ्या मुलावर प्रेम नाही. ती आता सर्व पैसे आणि कीर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याचा विचार करत आहे. स्मृतीचा भाऊ आणि वडील माझ्या घरी आले होते."

"स्मृतीचा भाऊ माझ्या पैशावर ऑस्ट्रेलियातून भारतात आला होता. मला आणि माझ्या कुटुंबाला पैशाची हाव नाही. स्मृतीने माझ्या मुलासोबत प्रेमाचा सौदा केला आहे, स्मृतीने सर्व पैसे आणि कीर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याचा प्लॅन केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या संवेदना फक्त स्मृतीलाच का? अंशुमनची आई देखील एक महिला आहे. तिच्या वेदना कोणाला कळणार?"

गेल्या वर्षी १९ जुलै रोजी सियाचीनमध्ये लष्कराच्या तंबूला लागलेल्या आगीतून आपल्या साथीदारांना वाचवताना अंशुमन सिंह शहीद झाले होते. त्यानंतर त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पत्नी स्मृती सिंह आणि आई यांना कीर्ती चक्र प्रदान केले. मात्र, तेव्हापासून यावरून वाद सुरू झाला आहे.

अंशुमनच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, स्मृती सिंह यांनी त्यांच्या मुलाला मिळालेल्या कीर्ती चक्राला स्पर्शही करू दिला नाही. ती सर्व काही घेऊन निघून गेली. आमचा मुलगाही शहीद झाला आणि आम्हाला काहीच मिळालं नाही असं म्हणत त्यांनी आपल्या सुनेवर गंभीर आरोप केले आहेत.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान