शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

वयाच्या ७ व्या वर्षी घरच्यांनी बळजबरीनं लग्न लावलं; १२ वर्षानंतर ‘ती’ची वनवासातून सुटका झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 15:46 IST

भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं.

ठळक मुद्देफॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशाने हरिवल्लभ खत्री यांनी मानसीचं लग्न रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाआदेशात मानसीला बालविवाहाच्या बंधनातून मुक्त करण्यात आले.डॉ. कृती भारती यांच्यामुळे बालविवाहाच्या वनवासातून माझी सुटका झाली

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात १९ वर्षीय बालिका वधूनं केवळ ७ वर्षाची असताना लग्न केले होते. अखेर १२ वर्षांनी बालविवाहच्या जाळ्यातून ती सुखरुप सुटली. बालवधू मानसीने भीलवाडा येथील फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले. बालविवाह रद्द व्हावा अशी मागणी करणारी याचिका तिने कोर्टात दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश हरिवल्लभ खत्री यांनी तिची दुर्दशा ऐकून संवेदनशीलपणे निर्णय सुनावला. मानसीचा बालविवाह रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय कोर्टाने बालविवाह विरोधात चांगलीच चपराक दिली आहे.

वयाच्या ७ व्या वर्षी मानसीचं लग्न

भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं. जवळपास १२ वर्ष तिला बालविवाहाचा फटका बसला. या काळात पंचायत आणि अन्य जातीकडून तिच्या गौना(विवाहातील एक समारंभ) करण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. इतकचं नाही तर तिच्या कुटुंबालाही धमकी दिली होती.

फॅमिली कोर्टात पोहचला बालविवाह रद्द करण्याचा खटला

याच दरम्यान, मानसीने बालविवाह रद्द करण्यासाठी सारथी ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या डॉ. कृती भारती यांच्या अभियानाविषयी माहिती मिळवली. त्यानंतर लग्न रद्द करण्यासाठी मानसीने त्यांच्याशी संपर्क साधला. डॉ. कृती जोधपूर ते भीलवाडा आल्या होत्या. यावर्षी मार्च महिन्यात मानसीने बालविवाह रद्द करण्यासाठी फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले. डॉ. कृती भारती मानसीसोबत भीलवाडा येथील फॅमिली कोर्टात पोहचल्या तिथे कोर्टाला बालविवाहाशी निगडीत काही पुरावे सादर केले.

न्यायाधीशांनी सुनावला ऐतिहासिक निर्णय

फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशाने हरिवल्लभ खत्री यांनी मानसीचं लग्न रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. १२ वर्षापूर्वी वयाच्या ७ व्या वर्षी मानसीचं लग्न झालं होतं. आदेशात मानसीला बालविवाहाच्या बंधनातून मुक्त करण्यात आले. बालविवाहामुळे मुलांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब होते असं कोर्टाने सांगितले. कोर्टाच्या निर्णयावर मानसी म्हणाली की, डॉ. कृती भारती यांच्यामुळे बालविवाहाच्या वनवासातून माझी सुटका झाली. मी बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मला यापुढे शिक्षण सुरुच ठेवायचं आहे. मला शिकून शिक्षक बनायचं आहे असं ती म्हणाली.

टॅग्स :Courtन्यायालय