शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वयाच्या ७ व्या वर्षी घरच्यांनी बळजबरीनं लग्न लावलं; १२ वर्षानंतर ‘ती’ची वनवासातून सुटका झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 15:46 IST

भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं.

ठळक मुद्देफॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशाने हरिवल्लभ खत्री यांनी मानसीचं लग्न रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाआदेशात मानसीला बालविवाहाच्या बंधनातून मुक्त करण्यात आले.डॉ. कृती भारती यांच्यामुळे बालविवाहाच्या वनवासातून माझी सुटका झाली

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात १९ वर्षीय बालिका वधूनं केवळ ७ वर्षाची असताना लग्न केले होते. अखेर १२ वर्षांनी बालविवाहच्या जाळ्यातून ती सुखरुप सुटली. बालवधू मानसीने भीलवाडा येथील फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले. बालविवाह रद्द व्हावा अशी मागणी करणारी याचिका तिने कोर्टात दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश हरिवल्लभ खत्री यांनी तिची दुर्दशा ऐकून संवेदनशीलपणे निर्णय सुनावला. मानसीचा बालविवाह रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय कोर्टाने बालविवाह विरोधात चांगलीच चपराक दिली आहे.

वयाच्या ७ व्या वर्षी मानसीचं लग्न

भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं. जवळपास १२ वर्ष तिला बालविवाहाचा फटका बसला. या काळात पंचायत आणि अन्य जातीकडून तिच्या गौना(विवाहातील एक समारंभ) करण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. इतकचं नाही तर तिच्या कुटुंबालाही धमकी दिली होती.

फॅमिली कोर्टात पोहचला बालविवाह रद्द करण्याचा खटला

याच दरम्यान, मानसीने बालविवाह रद्द करण्यासाठी सारथी ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या डॉ. कृती भारती यांच्या अभियानाविषयी माहिती मिळवली. त्यानंतर लग्न रद्द करण्यासाठी मानसीने त्यांच्याशी संपर्क साधला. डॉ. कृती जोधपूर ते भीलवाडा आल्या होत्या. यावर्षी मार्च महिन्यात मानसीने बालविवाह रद्द करण्यासाठी फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले. डॉ. कृती भारती मानसीसोबत भीलवाडा येथील फॅमिली कोर्टात पोहचल्या तिथे कोर्टाला बालविवाहाशी निगडीत काही पुरावे सादर केले.

न्यायाधीशांनी सुनावला ऐतिहासिक निर्णय

फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशाने हरिवल्लभ खत्री यांनी मानसीचं लग्न रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. १२ वर्षापूर्वी वयाच्या ७ व्या वर्षी मानसीचं लग्न झालं होतं. आदेशात मानसीला बालविवाहाच्या बंधनातून मुक्त करण्यात आले. बालविवाहामुळे मुलांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब होते असं कोर्टाने सांगितले. कोर्टाच्या निर्णयावर मानसी म्हणाली की, डॉ. कृती भारती यांच्यामुळे बालविवाहाच्या वनवासातून माझी सुटका झाली. मी बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मला यापुढे शिक्षण सुरुच ठेवायचं आहे. मला शिकून शिक्षक बनायचं आहे असं ती म्हणाली.

टॅग्स :Courtन्यायालय