शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

वयाच्या ७ व्या वर्षी घरच्यांनी बळजबरीनं लग्न लावलं; १२ वर्षानंतर ‘ती’ची वनवासातून सुटका झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 15:46 IST

भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं.

ठळक मुद्देफॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशाने हरिवल्लभ खत्री यांनी मानसीचं लग्न रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाआदेशात मानसीला बालविवाहाच्या बंधनातून मुक्त करण्यात आले.डॉ. कृती भारती यांच्यामुळे बालविवाहाच्या वनवासातून माझी सुटका झाली

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात १९ वर्षीय बालिका वधूनं केवळ ७ वर्षाची असताना लग्न केले होते. अखेर १२ वर्षांनी बालविवाहच्या जाळ्यातून ती सुखरुप सुटली. बालवधू मानसीने भीलवाडा येथील फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले. बालविवाह रद्द व्हावा अशी मागणी करणारी याचिका तिने कोर्टात दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश हरिवल्लभ खत्री यांनी तिची दुर्दशा ऐकून संवेदनशीलपणे निर्णय सुनावला. मानसीचा बालविवाह रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय कोर्टाने बालविवाह विरोधात चांगलीच चपराक दिली आहे.

वयाच्या ७ व्या वर्षी मानसीचं लग्न

भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं. जवळपास १२ वर्ष तिला बालविवाहाचा फटका बसला. या काळात पंचायत आणि अन्य जातीकडून तिच्या गौना(विवाहातील एक समारंभ) करण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. इतकचं नाही तर तिच्या कुटुंबालाही धमकी दिली होती.

फॅमिली कोर्टात पोहचला बालविवाह रद्द करण्याचा खटला

याच दरम्यान, मानसीने बालविवाह रद्द करण्यासाठी सारथी ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या डॉ. कृती भारती यांच्या अभियानाविषयी माहिती मिळवली. त्यानंतर लग्न रद्द करण्यासाठी मानसीने त्यांच्याशी संपर्क साधला. डॉ. कृती जोधपूर ते भीलवाडा आल्या होत्या. यावर्षी मार्च महिन्यात मानसीने बालविवाह रद्द करण्यासाठी फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले. डॉ. कृती भारती मानसीसोबत भीलवाडा येथील फॅमिली कोर्टात पोहचल्या तिथे कोर्टाला बालविवाहाशी निगडीत काही पुरावे सादर केले.

न्यायाधीशांनी सुनावला ऐतिहासिक निर्णय

फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशाने हरिवल्लभ खत्री यांनी मानसीचं लग्न रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. १२ वर्षापूर्वी वयाच्या ७ व्या वर्षी मानसीचं लग्न झालं होतं. आदेशात मानसीला बालविवाहाच्या बंधनातून मुक्त करण्यात आले. बालविवाहामुळे मुलांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब होते असं कोर्टाने सांगितले. कोर्टाच्या निर्णयावर मानसी म्हणाली की, डॉ. कृती भारती यांच्यामुळे बालविवाहाच्या वनवासातून माझी सुटका झाली. मी बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मला यापुढे शिक्षण सुरुच ठेवायचं आहे. मला शिकून शिक्षक बनायचं आहे असं ती म्हणाली.

टॅग्स :Courtन्यायालय