शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
अमेरिकेत फिरायला गेले, तिथेच काळाने घाला घातला; आई-वडीलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
4
जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा अदानींनी त्यानंच बनवला रस्ता, पाहा डिटेल्स
5
MSRTC: एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल!
6
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
7
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
8
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
9
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
10
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
11
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
12
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
13
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
14
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून परतलेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
15
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
16
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
17
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
18
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
19
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
20
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा

महाराष्ट्र, उत्तर भारतात लग्नं जास्त टिकतात

By admin | Updated: January 18, 2016 12:17 IST

पूर्वेकडील राज्यांपेक्षा महाराष्ट्र, उत्तर भारतातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ - उत्तर भारतातील पंजाबपासून बिहार पर्यंत आणि पश्चिमेकडे महाराष्ट्रातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे. तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अतिशय कमी असल्याचे २०११ च्या जनगणनेच्या आकड्यांमधून स्पष्ट झालं आहे. पंजाब, बिहार, महाराष्ट्र येथे ११-१२ टक्के जोडप्यांचं लग्न ४० वर्षांहून अधिक काळ टिकतं तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अवघं ७ टक्के आहे. मेघालयमध्ये तर अवघे ४.१ टक्के जोडपी ४० वर्षांहून अधिक काळ लग्नबंधनात आहेत. हरियाण वा महाराष्ट्राच्या तुलनेत हा आकडा एक-तृतियांश आहे. 
संपूर्ण देशभरात एकूण १० टक्के जोडप्यांची लग्नं ४० वर्षांहून अधिक काळ टिकली आहेत. समाजशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लग्न किती वर्ष टिकतं याचं प्रमाण प्रेम, एकनिष्ठता यापेक्षा रिती-रिवाज, परंपरा आणि प्रकृती, स्वास्थ्यावर जास्त अवलंबून असतं. तसेच त्या जोडप्याचं लग्न कितव्या वर्षी झालं आणि ते किती काळ जगले हेही लग्न टिकण्याच्या कालावधीतील महत्वाचे मुद्दे आहेत. सध्या नागरिकांचे आयुष्यमान वाढले असल्याने, त्यांच्या वैवाहिक जीवनाचा कालावधीही वाढतो. 
उत्तर भारतात तरूण-तरूणींचं लग्न कमी वयातच केलं जातं आणि त्यांच आयुष्य जास्त असल्याने त्यांचे वैवाहिक जीवनही बराच काळ टिकतं. तर पूर्वैकडील राज्यांमध्ये अगदी उलटी परिस्थिती आहे, तेथे लग्न उशीरा लावली जातात. हरिणायात २१ टक्के पुरूषांचं लग्न २१ व्या वर्षाच्या आधीच होऊन जातं, पण मेघालयमध्ये हाच आकडा अवघा ११ टक्के आहे. तर हरियाणात ३८ टक्के महिलाचं लग्न १८ वर्षांआधीच होत आणि मेघालयात तीच टक्केवारी अवघी १५ टक्क असल्याचे दिसून आले आहे. 
 
जास्त काळ लग्न टिकणारी राज्यं ( ४० वर्षे वा अधिक) - 
हरियाणा - ११.६ %
महाराष्ट्र - ११.६%
उत्तर प्रदेश - ११.६%
मध्य प्रदेश - ११.५%
राजस्थान - ११.२%
 
कमी वर्ष लग्न टिकणारी ५ राज्यं : 
दादरा आणि नगर हवेली - ५.४%
आसाम - ५.२ %
नागालँड - ४.८ %
अरूणाचल प्रदेश - ४.७%
मेघालय - ४.१%