शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, उत्तर भारतात लग्नं जास्त टिकतात

By admin | Updated: January 18, 2016 12:17 IST

पूर्वेकडील राज्यांपेक्षा महाराष्ट्र, उत्तर भारतातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ - उत्तर भारतातील पंजाबपासून बिहार पर्यंत आणि पश्चिमेकडे महाराष्ट्रातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे. तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अतिशय कमी असल्याचे २०११ च्या जनगणनेच्या आकड्यांमधून स्पष्ट झालं आहे. पंजाब, बिहार, महाराष्ट्र येथे ११-१२ टक्के जोडप्यांचं लग्न ४० वर्षांहून अधिक काळ टिकतं तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अवघं ७ टक्के आहे. मेघालयमध्ये तर अवघे ४.१ टक्के जोडपी ४० वर्षांहून अधिक काळ लग्नबंधनात आहेत. हरियाण वा महाराष्ट्राच्या तुलनेत हा आकडा एक-तृतियांश आहे. 
संपूर्ण देशभरात एकूण १० टक्के जोडप्यांची लग्नं ४० वर्षांहून अधिक काळ टिकली आहेत. समाजशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लग्न किती वर्ष टिकतं याचं प्रमाण प्रेम, एकनिष्ठता यापेक्षा रिती-रिवाज, परंपरा आणि प्रकृती, स्वास्थ्यावर जास्त अवलंबून असतं. तसेच त्या जोडप्याचं लग्न कितव्या वर्षी झालं आणि ते किती काळ जगले हेही लग्न टिकण्याच्या कालावधीतील महत्वाचे मुद्दे आहेत. सध्या नागरिकांचे आयुष्यमान वाढले असल्याने, त्यांच्या वैवाहिक जीवनाचा कालावधीही वाढतो. 
उत्तर भारतात तरूण-तरूणींचं लग्न कमी वयातच केलं जातं आणि त्यांच आयुष्य जास्त असल्याने त्यांचे वैवाहिक जीवनही बराच काळ टिकतं. तर पूर्वैकडील राज्यांमध्ये अगदी उलटी परिस्थिती आहे, तेथे लग्न उशीरा लावली जातात. हरिणायात २१ टक्के पुरूषांचं लग्न २१ व्या वर्षाच्या आधीच होऊन जातं, पण मेघालयमध्ये हाच आकडा अवघा ११ टक्के आहे. तर हरियाणात ३८ टक्के महिलाचं लग्न १८ वर्षांआधीच होत आणि मेघालयात तीच टक्केवारी अवघी १५ टक्क असल्याचे दिसून आले आहे. 
 
जास्त काळ लग्न टिकणारी राज्यं ( ४० वर्षे वा अधिक) - 
हरियाणा - ११.६ %
महाराष्ट्र - ११.६%
उत्तर प्रदेश - ११.६%
मध्य प्रदेश - ११.५%
राजस्थान - ११.२%
 
कमी वर्ष लग्न टिकणारी ५ राज्यं : 
दादरा आणि नगर हवेली - ५.४%
आसाम - ५.२ %
नागालँड - ४.८ %
अरूणाचल प्रदेश - ४.७%
मेघालय - ४.१%