शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वऱ्हाडी आले, दारू न मिळाल्यानं विधी न करताच बसून राहिले; लग्न मोडण्याची वेळ आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 07:10 IST

दारुबंदीमुळे आदिवासी युवतीचे लग्न थांबले: बिहारमध्ये सरपंचाला अटक

- एस.पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये दारूबंदी कायद्यामुळे एका आदिवासी युवतीचे लग्न मोडण्याच्या पायरीवर आले आहे. घरी आलेले वऱ्हाडी लग्नाचे विधी न करताच बसून आहेत. ही घटना बांका जिल्ह्यातील बौंसी ठाण्याच्या हद्दीतील लौंगाय पंचायतमधील. आदिवासी परंपरेनुसार देवी-देवतांना नैवेद्य म्हणून दारू सरपंचाच्या हस्ते अर्पण केली जाते. प्रत्यक्षात पोलिसांनी छापा मारून दारू जप्त केली व सरपंचाला तुरुंगात पाठवले. यामुळे लग्न थांबले. दिनेश मुर्मू यांची बहीण बासमती मुर्मूचे लग्न अरविंद मरांडीशी ठरलेले आहे. ५ एप्रिल रोजी वरात गावात आली. आदिवासी परंपरेनुसार सरपंच गोपाळ सोरेन यांनाच लग्नाचे विधी पूर्ण करायचे होते. तेवढ्यात तेथे पोलीस आले व घरात दारू सापडल्याचा आरोप करून त्यांनी सोरेन यांना अटक केली. सरपंचाशिवाय आदिवासी समाजात लग्नाचे विधी होत नाहीत. देवी-देवतांना नैवेद्य म्हणून जवळपास दोन लीटर दारू घरात ठेवली गेली होती. परंतु, पोलिसांचे म्हणणे १३ लीटर दारू जप्त केली. सरपंच आल्यानंतरच लग्न होईल, असे म्हटले जात आहे. वराकडील लोक गावात थांबलेले आहेत. परंपरा अशी की, लग्नानंतरच वर पत्नीला घेऊन गावात प्रवेश करू शकतो, नाही तर युवतीला विधवा घोषित करावे लागेल. त्यामुळे वधूचे वडील अस्वस्थ आहेत.

दिनेश मुर्मू यांचे वडील रसिकलाल मुर्मू यांनी सर्व मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बासमतीचे लग्न होऊ देण्याची मागणी केली आहे. आदिवासी समाजातील महिला व पुरुषांनी विभागीय कार्यालयात गटविकास अधिकारी अभिनव भारती यांच्याकडे तक्रार करून न्याय मागितला आहे. माजी आमदार संजय कुमार यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक संजय कुमार म्हणाले,“ दारूबंदी कायद्याचे कठोरपणे पालन केले जात आहे. दारूबंदी कायद्यात कोणत्याही विशिष्ट जातीसाठी वेगळी तरतूद नाही. कायदा सगळ्यांसाठी एकच आहे. लग्न होणे किंवा थांबणे हा त्यांचा प्रश्न आहे.” 

टॅग्स :marriageलग्न