शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

5 दिवसांत लढाई जिंकली, जाणून घ्या काय होते सरदार पटेलांचे 'ऑपरेशन पोलो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 22:23 IST

मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम या लढ्यालाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याएवढेच महत्व आहे. या लढ्यातही उस्मानाबादपासून ते अंजंठा वेरुळच्या जिल्ह्यातील क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली

मुंबई - मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम या लढ्यालाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याएवढेच महत्व आहे. या लढ्यातही उस्मानाबादपासून ते अंजंठा वेरुळच्या जिल्ह्यातील क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. हैदराबाद संस्थान खालसा करण्यासाठी भारत सरकारने केलेल्या कारवाईला ऑपरेशन पोलो असे म्हटले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशान्वये 'ऑपरेशन पोलो' ही मोहीम राबवून हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण झाले आणि मराठवाडा मुक्त झाला. त्यामुळेच या लढ्याला मराठवाडा मुक्ती संग्राम असेही म्हटले जाते. 

उस्मान अली शाह आसिफ जाह सातवा हा हैदराबाद संस्थानचा त्यावेळचा प्रमुख होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 535 लहानसहान संस्थाने खालसा करण्यात आली. या सर्व संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलिनीकरण करण्यात आले. मात्र, हैदराबादच्या निजामाने आपले संस्थान विलिनीकरण करण्यास नकार दिला. त्यावेळी निजामाचा प्रमुख म्हणून कासिम रिजवी हैदराबाद संस्थान पाहात होता. रिजवीने रझाकार नावाची संघटना उभारली होती. जवळपास 2 हजार खासगी सैनिक या संघटनेत निजामासाठी काम करत होते. या संघटनेला पाकिस्तानचे नैतिक समर्थन होते, अशी माहिती आहे. तसेच निजामावर संस्थान खालसा करण्यासाठी भारत सरकारकडून दबाव टाकण्यात आला. त्यावेळी कासिम रिजवीने आणि त्याच्या रझाकार संघटनेने हैदराबादमधील हिंदूंच्या हत्या करण्यास सुरुवात केली. तसेच स्त्रियांवर बलात्कार करण्यात आल्याचाही उल्लेख आहे. कासिम रिजवीच्या या अत्याचाराचा भडका उडल्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा पुकारण्यात आला. त्यामध्ये सध्याच्या मराठवाड्यातील अनेक क्रांतीकारकांनी हौतात्म पत्कारले. 

देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्य हैदराबादेत पाठवले. त्यावेळी 5 दिवस भारतीय सैन्याने निजामाच्या सैन्याशी दोनहात करत त्यांचा पराभव केला. मेजर जनरल जे. एन. चौधरी, ले.जनरल इ. एम. गोदार्द यांनी या कारवाईची आखणी केली होती. या कारवाईसाठी भारतीय लष्करचे साधारण 36,000 जवान होते. आर्म्ड ब्रिगेड, स्मॅश फोर्स, स्ट्राइक फोर्स, मोर्टर बटालियन, गुरखा रायफल्स, पंजाब रेजिमेंट्स होते. 17 सप्टेंबर 1948 ला निजामानं शरणागती पत्करली. कासिम रिझवी याला अटक झाली. लायक अलि मंत्रिमंडळाचे प्रमुख होते ते पळूनच गेले. 4 दिवस 13 तास चाललेल्या या कारवाईत भारतीय लष्कराचे 32 जवान शहीद झाले तर 97 जखमी झाले होते. अखेर, 17 सप्टेंबर 1948 रोजी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष 32 दिवसांनी हैदराबाद संस्थान भारतात आले मराठवाड्यात तिरंगा फडकला. दरम्यान, निजामाच्या लष्करात 42,000 सैनिक तर 25,000 रोहिले बाहेरच्या राज्यातून आणले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाNijampurनिजामपूर