शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

VIDEO: आधी खुर्चीवर बसवले, पाण्याचा ग्लास दिला अन्...; शरद पवारांसाठी आधार बनले PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 19:12 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने सर्वांचे मन जिंकले आहे.

Marathi Sahitya Sammelan 2025: नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसल्याचे पाहायला मिळालं. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना खुर्चीत बसण्यासाठी मदत केल्याचे पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीनंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केलं. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कितीही टीका करत असले तरी कधी कोणाचा आदर करावा हे ते विसरत नाहीत. याचेच उदाहरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनावेळी पाहायला मिळालं. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शरद पवारांसाठी आधार बनले आणि त्यांना खुर्चीला  धरून बसवले. एवढेच नाही तर खुद्द पंतप्रधानांनी बाटली उघडून शरद पवारांसाठी ग्लासात पाणी देखील दिले. हे पाहून उपस्थित लोकांना टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधान मोदींच्या या शैलीने सर्वांची मने जिंकली.

भाषण संपल्यानंतर शरद पवार हे त्यांचे आसन असलेल्या ठिकाणी बसण्यासाठी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून शरद पवार यांची खुर्ची धरुन ठेवली जेणेकरुन त्यांना व्यवस्थित बसता येईल. जो पर्यंत शरद पवार खुर्चीवर बसले नाहीत तोपर्यंत पंतप्रधान मोदी उभे होते. त्यानंतर खाली बसून पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यासाठी ग्लासात पाणी ओतलं आणि तो पुढे केला. यावेळी समालोचन करणाऱ्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीचे कौतुक केले.

शरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत याचा मला आनंद आहे. सर्वांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका बजावली याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. १९५४ साली पहिल्यांदा दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालं. तेव्हा पंडिच नेहरु यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं होतं," असं शरद पवार यांनी म्हटलं.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस