शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

VIDEO: आधी खुर्चीवर बसवले, पाण्याचा ग्लास दिला अन्...; शरद पवारांसाठी आधार बनले PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 19:12 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने सर्वांचे मन जिंकले आहे.

Marathi Sahitya Sammelan 2025: नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसल्याचे पाहायला मिळालं. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना खुर्चीत बसण्यासाठी मदत केल्याचे पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीनंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केलं. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कितीही टीका करत असले तरी कधी कोणाचा आदर करावा हे ते विसरत नाहीत. याचेच उदाहरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनावेळी पाहायला मिळालं. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शरद पवारांसाठी आधार बनले आणि त्यांना खुर्चीला  धरून बसवले. एवढेच नाही तर खुद्द पंतप्रधानांनी बाटली उघडून शरद पवारांसाठी ग्लासात पाणी देखील दिले. हे पाहून उपस्थित लोकांना टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधान मोदींच्या या शैलीने सर्वांची मने जिंकली.

भाषण संपल्यानंतर शरद पवार हे त्यांचे आसन असलेल्या ठिकाणी बसण्यासाठी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून शरद पवार यांची खुर्ची धरुन ठेवली जेणेकरुन त्यांना व्यवस्थित बसता येईल. जो पर्यंत शरद पवार खुर्चीवर बसले नाहीत तोपर्यंत पंतप्रधान मोदी उभे होते. त्यानंतर खाली बसून पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यासाठी ग्लासात पाणी ओतलं आणि तो पुढे केला. यावेळी समालोचन करणाऱ्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीचे कौतुक केले.

शरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत याचा मला आनंद आहे. सर्वांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका बजावली याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. १९५४ साली पहिल्यांदा दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालं. तेव्हा पंडिच नेहरु यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं होतं," असं शरद पवार यांनी म्हटलं.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस