शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: आधी खुर्चीवर बसवले, पाण्याचा ग्लास दिला अन्...; शरद पवारांसाठी आधार बनले PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 19:12 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने सर्वांचे मन जिंकले आहे.

Marathi Sahitya Sammelan 2025: नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसल्याचे पाहायला मिळालं. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना खुर्चीत बसण्यासाठी मदत केल्याचे पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीनंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केलं. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कितीही टीका करत असले तरी कधी कोणाचा आदर करावा हे ते विसरत नाहीत. याचेच उदाहरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनावेळी पाहायला मिळालं. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शरद पवारांसाठी आधार बनले आणि त्यांना खुर्चीला  धरून बसवले. एवढेच नाही तर खुद्द पंतप्रधानांनी बाटली उघडून शरद पवारांसाठी ग्लासात पाणी देखील दिले. हे पाहून उपस्थित लोकांना टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधान मोदींच्या या शैलीने सर्वांची मने जिंकली.

भाषण संपल्यानंतर शरद पवार हे त्यांचे आसन असलेल्या ठिकाणी बसण्यासाठी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून शरद पवार यांची खुर्ची धरुन ठेवली जेणेकरुन त्यांना व्यवस्थित बसता येईल. जो पर्यंत शरद पवार खुर्चीवर बसले नाहीत तोपर्यंत पंतप्रधान मोदी उभे होते. त्यानंतर खाली बसून पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यासाठी ग्लासात पाणी ओतलं आणि तो पुढे केला. यावेळी समालोचन करणाऱ्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीचे कौतुक केले.

शरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत याचा मला आनंद आहे. सर्वांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका बजावली याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. १९५४ साली पहिल्यांदा दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालं. तेव्हा पंडिच नेहरु यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं होतं," असं शरद पवार यांनी म्हटलं.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस