शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

'हा' मराठी माणूस आहे त्रिपुरामधील भाजपाच्या विजयाचा शिल्पकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 16:54 IST

त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य भाजपाने काबीज केले आहे. गेल्या 25 वर्षांपासूनची डाव्यांची या राज्यातील सत्ता उलथवून टाकणे एक मोठे आव्हान होते.

ठळक मुद्देत्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर सुनील देवधर हे नाव समोर आले आहे. त्रिपुरा जिंकणे हा मोदी सरकारसाठी फक्त ऐतिहासिक विजय नाहीय तर भाजपाला यानिमित्ताने सुनील देवधर यांच्या रुपाने परिस गवसला आहे. 

नवी दिल्ली - त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य भाजपाने काबीज केले आहे. गेल्या 25 वर्षांपासूनची डाव्यांची या राज्यातील सत्ता उलथवून टाकणे एक मोठे आव्हान होते. माणिक सरकार गेली सलग २० वर्षे मुख्यमंत्री पदावर होते त्यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कामाच्या पार्श्वभूमीवर विजय मिळवणे अत्यंत कठीण काम होते. पण डाव्यांची या राज्यातील मक्तेदारी मोडून काढणे भाजपाला शक्य झाले ते संघटनात्मक शक्तीच्या बळावर. 

त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर सुनील देवधर हे नाव समोर आले आहे. सुनील देवधर यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे भाजपाला त्रिपुराचा गड काबीज करता आला. मूळचे मुंबईकर असलेले सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झाले आहेत. गत विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे संपूर्ण राज्य जिंकण्यासाठी भाजपाला शुन्यातून सुरुवात करायची होती. 

दोन वर्षांपूर्वी सुनील देवधर यांच्याकडे त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून त्यांनी या राज्यात तळ ठोकला व राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरु केली. त्रिपुरा जिंकणे हा मोदी सरकारसाठी फक्त ऐतिहासिक विजय नाहीय तर भाजपाला यानिमित्ताने सुनील देवधर यांच्या रुपाने परिस गवसला आहे. 

जाणून घेऊया कोण आहेत सुनील देवधर - 52 वर्षांचे सुनील देवधर आरएसएसच्या तालमीत तयार झाले असून त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांना राज्याचे प्रभारी बनवण्यात आले. 

- 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सुनील देवधर यांच्यावर प्रचार व्यवस्थापकाची जबाबदारी होती. 

- नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुनील देवधर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनितीकार म्हणून काम करत होते. 

- देवधर यांनी मेघालयमध्ये आरएसएस प्रचारक म्हणूनही काम केले आहे. 

- 2013 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीत काम करताना देवधर यांच्या रणनितीमुळे भाजपाला 10 पैकी सात जागा जिंकता आल्या होत्या. 

- त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली.                         

- आदिवासी बहुल भागातील  मते भाजपाकडे वळवण्यासाठी देवधर यांनी  जानेवारी महिन्यात आयपीएफटीसोबत आघाडी केली. 

- आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही हे सुनील देवधर यांनी जाहीर केले आहे.    

                                

 

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018