शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

मराठी परिपूर्ण भाषा अन् अमृताहूनी गोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 02:10 IST

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : मराठी ही संपूर्ण भाषा आहे. मी जेव्हा मराठीबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके’, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेची श्रीमंती विशद केली.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विज्ञान भवनात थाटात उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष खा. शरद पवार, मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे, महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे, संजय नहार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधानांनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. ते म्हणाले की, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या मराठीचे मी देशाच्या राजधानीत अतिशय मनापासून अभिवादन करतो.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हे माझे भाग्य : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय माझ्या कार्यकाळात झाला हे मी माझे भाग्य समजतो, असे मोदी यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. भाषा संस्कृतीची वाहक असते. एक उत्तम समाज निर्माण करण्याचे काम भाषा करीत असते, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

काश्मिरी मुलींकडून नमोकार मंत्र, पसायदान : काश्मिरी मुलगी रुकय्या मकबूल हिने नमोकार मंत्र म्हटला. काश्मिरचीच शमिमा अख्तर हिने जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गीत सादर केले. शमिमा हिनेच कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान म्हटले.

राजकारण व साहित्य एकमेकांना पूरक : पवार

साहित्यिक आणि राजकारणी यांचे एक अतूट नाते आहे. संमेलनाच्यावेळी नेहमी जी चर्चा होत असते ती यावेळी झाली नाही ही आनंदाची बाब असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

टिळक, नेहरू, वाजपेयी, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या थोर माणसांनी साहित्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. राजकारणातील माणसे साहित्य क्षेत्रात आहेत. राजकारण आणि साहित्य  एकमेकांना पूरक आहेत, असेही पवार म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जी भूमिका बजावली आहे त्यासाठी मी समस्त मराठी जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.

भाषा बोलू तर जिवंत राहील : डॉ. भवाळकर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, भाषा ग्रंथात किंवा पुस्तकात राहून जीवंत राहणार नाही तर ती जेव्हा बोलली जाईल तेव्हा जिवंत राहील. भवाळकर यांच्या भाषणानंतर 'छान झाले' अशा शब्दात मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. भवाळकर यांनी देखील 'मळे पण गुजरात आवडे छे' असे गुजरातीत मोदी यांना उत्तर दिले.

आता दिल्ली विचाराने जिंकावी लागेल : मुख्यमंत्री

एकेकाळी दिल्ली शस्त्राने जिंकली जात होती. मात्र, आता दिल्ली जिंकायची असेल तर विचाराने जिंकावी लागेल. १७३७ मध्ये रानोजी शिंदे यांनी ज्या तालकटोरा येथे छावणी लावून दिल्ली जिंकली होती त्याच तालकटोरा स्टेडियममध्ये साहित्य संमेलन होत आहे ही मराठी माणसाची अभिमानाची गोष्ट आहे. जो मातृभाषेवर प्रेम करतो त्याला माया आणि वात्सल्य काय आहे हे समजते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन