शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

बिहारच्या जनगणनेमुळे मराठा आरक्षण चर्चेत; महाराष्ट्राचे होते लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 06:06 IST

राज्य सरकार प्रक्रिया घेणार समजून

सुनील चावके

नवी दिल्ली :बिहारच्या जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला ओबीसी वगळून वेगळे आरक्षण देण्याची भूमिका आता घ्यावीच लागेल, अशी प्रतिक्रिया दिल्लीतील भाजपच्या वर्तुळात उमटली आहे.

बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे आकडे येण्यापूर्वीच महाराष्ट्रात ओबीसीविरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण ट्रिपल टेस्टच्या निकषांवर निश्चित झालेले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीच्या आधारे आरक्षण देता येणार नाही. ओबीसीमध्ये समावेश न करता मराठा समाजाला वेगळे आरक्षण देणे क्रमप्राप्त ठरणार आहे. महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत, पण बिहारच्या आकडेवारीनंतर आता मराठा आरक्षण मुख्य मुद्दा ठरणार असल्याचे मत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.

तावडे म्हणतात, अभ्यास करणार

बिहारमधील जातींवर आधारित सर्वेक्षणाचे निष्कर्ष हे जनगणनेचे आकडे नाहीत. आम्ही त्याचा अभ्यास करीत आहोत.

मागास आणि अतिमागासांना या आकड्यांतून कसा लाभ पोहोचू शकतो, याचाही आम्ही अभ्यास करीत आहोत, अशी प्रतिक्रिया बिहार भाजपचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली.

राजदचे सर्वेसर्वा लालू यादव हे संपूर्ण ओबीसींचे नव्हे, तर १४ टक्के यादव समाजाचे नेते असल्याबाबत याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष वेधले.

सर्वेक्षणात महाराष्ट्राला स्वारस्य

मराठा आणि धनगर समाजासह अन्य समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यांना सामोरे जात असलेल्या महाराष्ट्र शासनाने बिहारच्या जातनिहाय सर्वेक्षणात स्वारस्य दाखवल्याचे समजते. बिहारमध्ये सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांशी महाराष्ट्राच्या एका महिला अधिकाऱ्याने संपर्क साधून या सर्वेक्षणाची प्रक्रिया समजून घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शासनाने मागितली माहिती

ओबीसींच्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ सप्टेंबर रोजी बोलावलेल्या बैठकीपूर्वी बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणना कशाप्रकारे पार पाडली, याची इत्थंभूत माहिती महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Biharबिहार