शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

माओवाद्यांनी घडविला ‘अग्निपथ’विराेधी हिंसाचार; एका नेत्याला बिहारमधून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 07:33 IST

हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचे तपासात उघड

पाटणा : अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारात झालेल्या हिंसाचारामागे माओवाद्यांचा हात असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला आहे. एका वरिष्ठ माओवादी नेत्यास अटक केल्यानंतर ही माहिती समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जूनमध्ये झालेल्या आंदोलनात लखिसराय येथे एक रेल्वे जाळण्यात आली होती. याप्रकरणी माओवादी नेता मनश्याम दास यास नुकतीच अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना सांगितले की, आपल्या सहानुभूतदारांच्या मदतीने आपण रेल्वे जाळली होती. एका गटाने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचेही त्याने पोलिसांसमोर कबूल केले.

तेलंगणा पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनश्याम दास यास लखिसरायमधून अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या एका घरातून तो आपल्या कारवाया करीत होता. त्याचा बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा येथील नक्षली संघटनांशी थेट संपर्क होता. त्याच्या खोलीतून माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. माओवादी नेत्यांना भेटण्यासाठी तो जंगलात जात असे. तसेच त्याचे शहरातील सुमारे अर्धा डझन नेत्यांशी संबंध असल्याचेही तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी सांगितले की, भागलपूर येथील विद्यापीठातील एका प्राध्यापकाचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे तपासात आढळले आहे. प्राध्यापकाने हा आरोप फेटाळला.

अग्निपथ योजनेविरुद्ध आजपासून मोहीम

अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चा रविवारी एक राष्ट्रीय मोहीम सुरु करणार आहे. निवृत्त सैन्य कर्मचाऱ्यांचा युनायटेड फ्रंट आणि विविध युवा संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे. स्वराज्य इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी शनिवारी सांगितले की, ७ ते १४ ऑगस्ट या काळात जय जवान, जय किसान संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. अग्निपथ योजनेचे विनाशकारी परिणाम लोकांना सांगणे, हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. शांततेच्या मार्गाने आपले मत मांडत ही योजना मागे घेण्यासाठी केंद्रावर दबाव टाकणे, हा यामागचा उद्देश आहे. आमचे शेतकरी आणि सैनिक संकटात असतील तर आमचा पाठीचा कणा तुटण्याचा धोका आहे. या अभियानांतर्गत विविध ठिकाणी रविवारी कार्यक्रम होतील. 

रेल्वेचे सर्वाधिक नुकसान

‘अग्निपथ’विराेधी आंदाेलनामध्ये रेल्वेचे सर्वाधिक नुकसान झाले. देशभरात सुमारे २५० काेटींहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. ९०० हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या हाेत्या. तर ५ लाखांहून अधिक तिकिटे रद्द करावी लागली हाेती.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाNarendra Modiनरेंद्र मोदी