शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

माओवाद्यांनी घडविला ‘अग्निपथ’विराेधी हिंसाचार; एका नेत्याला बिहारमधून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 07:33 IST

हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचे तपासात उघड

पाटणा : अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारात झालेल्या हिंसाचारामागे माओवाद्यांचा हात असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला आहे. एका वरिष्ठ माओवादी नेत्यास अटक केल्यानंतर ही माहिती समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जूनमध्ये झालेल्या आंदोलनात लखिसराय येथे एक रेल्वे जाळण्यात आली होती. याप्रकरणी माओवादी नेता मनश्याम दास यास नुकतीच अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना सांगितले की, आपल्या सहानुभूतदारांच्या मदतीने आपण रेल्वे जाळली होती. एका गटाने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचेही त्याने पोलिसांसमोर कबूल केले.

तेलंगणा पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनश्याम दास यास लखिसरायमधून अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या एका घरातून तो आपल्या कारवाया करीत होता. त्याचा बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा येथील नक्षली संघटनांशी थेट संपर्क होता. त्याच्या खोलीतून माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. माओवादी नेत्यांना भेटण्यासाठी तो जंगलात जात असे. तसेच त्याचे शहरातील सुमारे अर्धा डझन नेत्यांशी संबंध असल्याचेही तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी सांगितले की, भागलपूर येथील विद्यापीठातील एका प्राध्यापकाचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे तपासात आढळले आहे. प्राध्यापकाने हा आरोप फेटाळला.

अग्निपथ योजनेविरुद्ध आजपासून मोहीम

अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चा रविवारी एक राष्ट्रीय मोहीम सुरु करणार आहे. निवृत्त सैन्य कर्मचाऱ्यांचा युनायटेड फ्रंट आणि विविध युवा संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे. स्वराज्य इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी शनिवारी सांगितले की, ७ ते १४ ऑगस्ट या काळात जय जवान, जय किसान संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. अग्निपथ योजनेचे विनाशकारी परिणाम लोकांना सांगणे, हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. शांततेच्या मार्गाने आपले मत मांडत ही योजना मागे घेण्यासाठी केंद्रावर दबाव टाकणे, हा यामागचा उद्देश आहे. आमचे शेतकरी आणि सैनिक संकटात असतील तर आमचा पाठीचा कणा तुटण्याचा धोका आहे. या अभियानांतर्गत विविध ठिकाणी रविवारी कार्यक्रम होतील. 

रेल्वेचे सर्वाधिक नुकसान

‘अग्निपथ’विराेधी आंदाेलनामध्ये रेल्वेचे सर्वाधिक नुकसान झाले. देशभरात सुमारे २५० काेटींहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. ९०० हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या हाेत्या. तर ५ लाखांहून अधिक तिकिटे रद्द करावी लागली हाेती.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाNarendra Modiनरेंद्र मोदी