शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

बियास नदीच्या काठावरील १२ गावे पाण्याखाली; पोंग धरणाच्या पाण्याची पातळी १३९७ फुटांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 23:39 IST

धरणाच्या तलावात साडेसात लाखांहून अधिक पाणी शिरल्याने धरणाची पाणीपातळी १३९७ फुटांवर पोहचली होती.

नवी दिल्ली: पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील जवळपास १२ गावे बियास नदीच्या दोन्ही बाजूंनी पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने लोकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) भारतीय लष्कर आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. बीबीएमबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशमध्ये १२ आणि १३ तारखेला जोरदार पाऊस झाला, त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी अचानक वाढली.

धरणाच्या तलावात साडेसात लाखांहून अधिक पाणी शिरल्याने धरणाची पाणीपातळी १३९७ फुटांवर पोहचली होती. सायंकाळपर्यंत पाण्याची पातळी १३९९ फुटांच्या आसपास पोहोचली होती. धरणात सतत पाण्याची आवक सुरू असल्याने पूर दरवाजातून एक लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. 

अतिरिक्त पाणी सोडण्यापूर्वी, संबंधित राज्य सरकारे, विभाग आणि सखल भागातील बाधित क्षेत्रांना सल्ला देण्यात आला होता. मात्र यामुळे अनेक गावे पाण्यात बुडाली. पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, भारतीय लष्कर आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली. नदीच्या दोन्ही काठावरील शेकडो एकर भात, मका, बाजरी, ऊस पिके उद्ध्वस्त झाली आहेत. 

नदीच्या काठावर वसलेल्या बेला लुध्याडचन, हलेध, परळ, रियाली, मंड बाधपूर या गावांमधील अनेक कुटुंबांना हेलिकॉप्टरने हलवण्यात आले आहे. पाँग धरणातील पाण्याची पातळी १३९७ फूट नोंदवण्यात आली. ते धोक्याच्या चिन्ह १३९५ च्या फक्त दोन फूट वर आहे. तलावात पाण्याची आवक ५५३६७ क्युसेक आहे, तर शाह कालवा बंधार्‍यात फ्लड गेट व टर्बाइनद्वारे एकूण १३८२२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :floodपूरPunjabपंजाबHimachal Pradeshहिमाचल प्रदेश