शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

कडाडली टंचाईची वीज; सव्वा लाख कोटींच्या थकबाकीमुळे तोट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 07:25 IST

देशातील सर्वांत मोठा कोळसा उत्पादक असलेल्या कोल इंडिया लिमिटेडचे २०१८-१९ मध्ये  कोळशाचे उत्पादन ६०६ दशलक्ष टन होते. २०१९-२० यात घट होऊन ते ६०२ दशलक्ष टनावर आले.

शरद गुप्तानवी दिल्ली :  एकीकडे देशभरातील नागरिक तळपत्या उन्हाने कासावीस झाले आहेत. त्यात विजेची मागणीही वाढत आहे, तर दुसरीकडे कोळशाच्या टंचाईमुळे अनेक राज्यांना वीज कपातीला सामोरे जावे लागत आहे. अनेक राज्यांना गरजेपक्षा १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत कमी वीज मिळत आहे. देशांतील ७० टक्के वीजनिर्मिती कोळशावर चालणाऱ्या औष्णिक विद्युत केंद्रांत तयार होते. गेल्या चार वर्षांत देशांतील कोळसा उत्पादनात सातत्याने घट होत आहे. परिणामी, गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून ओढवलेले विजेचे संकट दूर झालेले नाही.

देशातील सर्वांत मोठा कोळसा उत्पादक असलेल्या कोल इंडिया लिमिटेडचे २०१८-१९ मध्ये  कोळशाचे उत्पादन ६०६ दशलक्ष टन होते. २०१९-२० यात घट होऊन ते ६०२ दशलक्ष टनावर आले. २०२०-२१ मध्ये आणखी घट होऊन ५९६ दशलक्ष टन झाले.  आयात केल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण कोळशावर थोडीफार आशा होती; परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे तीही मावळली. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचा भाव ३५ टक्के वाढला आहे.  त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागात आयात केलेल्या कोळशावर चालणारे औष्णिक विद्युत केंद्राची अनेक संयंत्रे ठप्प पडली आहेत.

सव्वा लाख कोटींच्या थकबाकीमुळे तोट्यातवीज संकटामागचे मुख्य कारण म्हणजे राज्यांच्या वीज वितरण महामंडळे (डिस्कॉम) २१ टक्के तोट्यात असणे. केंद्राने नोव्हेंबर २०१५ मध्ये उज्ज्वला डिस्कॉम एश्युरन्स योजना (उदय) सुरू केली; परंतु आजही राज्यांच्या वितरण कंपन्यांकडे १,२३,००० कोटींची थकबाकी आहे. त्यांनी कोल इंडिया लिमिटेडची थकबाकी चुकती न केल्याने नवीन खदानींचा विस्तार करण्यासाठी कोल इंडियाकडे पैसा नाही.

गंगाजळी रिती, उरले फक्त ८ हजार कोटी 

२०१५ मध्ये कोल इंडियाच्या खात्यात ३५ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त शिल्लक होती. त्याचा वापर नवीन खदानींऐवजी लाभांश वाटप करण्यासाठी केला. २०१९ मध्ये कोल इंडियाकडे फक्त ८ हजार कोटी रुपयेच उरले होते. - अनिल स्वरूप, माजी कोळसा सचिव 

पुरवठ्यासाठी ६०० हून अधिक प्रवासी ट्रेन रद्द 

आज रेल्वे सर्व विद्युत निर्मिती केंद्रांपर्यंत थेट कोळशाचा पुरवठा करण्यासाठी ६०० हून अधिक  प्रवासी ट्रेन रद्द केल्या असल्या तरी अनेक वर्षांपासून कोळसा उद्योग मालवाहू वाघिणीच्या (वॅगन) संकटाला सामोरे जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ओढवलेल्या संकटामुळे  सरकारने आता एक लाख  कोळसा वॅगन खरेदीचा आदेश जारी केला आहे.

देशावर असेच संकट २०१४ मध्येही असेच संकट २०१४ मध्ये देशाने अनुभवले होते. तेव्हा केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार आले असताना कोल इंडिया लिमिटेडने २०१४-१५ मध्ये कोळशाचे उत्पादन ३४ दशलक्ष टनाने (८ टक्के) वाढविले. २०१५-१६ मध्येही  उत्पादन ४४ दशलक्ष टनाने (१३ टक्के) वाढविले; परंतु २०१७ नंतर एक वर्षभर कोल इंडिया लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालकपद (सीएमडी) रिक्त असल्याने कोळसा उत्पादनावर परिणाम झाला.

इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याने इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा आयातीचा निर्णय घेतला आहे. ‘महाजेनको’च्या निविदेला मंजुरी देत इंडोनेशियातील कंपनी २० मे पासून कोळशाचा पुरवठा करणार आहे. हा कोळसा देशातील कोळशाच्या तुलनेत अडीच पट अधिक महाग आहे.             

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकट