शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

काँग्रेसच्या आव्हानामुळे पंतप्रधान मोदी घेणार राजस्थानात अनेक प्रचार सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 05:31 IST

राजस्थानमध्ये २०० विधानसभा जागांसाठी ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये विद्यमान सत्ताधारी भाजपाला पुन्हा विजय मिळवणे हे सोपे असणार नाही, असे आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमधून दिसून आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यात अनेक निवडणूक प्रचारसभा घेण्याचे ठरविले आहे.

जयपूर : राजस्थानमध्ये २०० विधानसभा जागांसाठी ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये विद्यमान सत्ताधारी भाजपाला पुन्हा विजय मिळवणे हे सोपे असणार नाही, असे आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमधून दिसून आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यात अनेक निवडणूक प्रचारसभा घेण्याचे ठरविले आहे.११ जागा असलेल्या अल्वार जिल्ह्यात रविवारी मोदी यांची पहिली प्रचारसभा होईल. या जिल्ह्यात विद्यमान ९ भाजपा आमदारांपैकी सात जणांना या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली आहे. येथील मुंदवारचे आमदार धर्मपाल चौधरी यांचे निधन झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. अजमेर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही भाजपाला अपयश आले होते. त्यामुळेच मोदी याच जिल्ह्यातून प्रचाराला सुरूवात करणार आहेत.मोदींच्या प्रचारसभा २६ नोव्हेंबर रोजी भिलवारा, बन्सवारा, कोटा येथे होतील. त्यानंतर २८ नोव्हेंबरला ते नागौर, भरतपूर व ३ डिसेंबरला जोधपूर येथे त्यांच्या सभा होतील. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक गेहलोत जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरामधून निवडणूक लढवत आहेत. ४ डिसेंबर रोजी हनुमानगढ, सिकर, जयपूर येथे पंतप्रधानांच्या प्रचारसभा आहेत.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक