शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात तब्बल १०० आमदार भाजपा सोडण्याच्या तयारीत, पक्ष सोडणाऱ्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:47 IST

Uttar Pradesh Assembly Election 2022 : स्वामीप्रसाद मौर्य यांचे समर्थक आमदार मुकेश वर्मा हेही भाजपामधून बाहेर पडले असून, पक्ष सोडताना त्यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढवणारा दावा केला आहे. भाजपाचे १०० आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत, असा दावा मुकेश वर्मा यांनी केला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्यापासून विविध पक्षांतील इनकमिंग आऊटगोईंगला उधाण आले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपामधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होत आहे. स्वामी प्रसाद मौर्य, दारासिंह चौहान आणि धर्मसिंह सैनी या मंत्र्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता काही आमदारांनीही भाजपाला रामराम ठोकला असून, त्यातील एका आमदाराने पक्ष सोडताना केलेल्या दाव्यामुळे भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.

स्वामीप्रसाद मौर्य यांचे समर्थक आमदार मुकेश वर्मा हेही भाजपामधून बाहेर पडले असून, पक्ष सोडताना त्यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढवणारा दावा केला आहे. भाजपाचे १०० आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत, असा दावा मुकेश वर्मा यांनी केला आहे. तसेच मुकेश वर्मा यांनी त्यांच्या राजीनामापत्रामध्ये योगी आदित्यनाथ आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची घोषणा होताच भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मंगळवारी जबर धक्का बसला. योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदासोबत भाजपाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर, युपीतील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला असून आता सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी गुरुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला. राज्यातील दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे. तसेच, मागास आणि ओबीसी प्रवर्गाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेय. त्यामुळे, मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतोय, असे दारासिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले होते. आता, युपीचे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. धर्मसिंह सैनी यांनीही राजीनामा दिला आहे. ज्या अपक्षेनं दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि लहान-सहान व्यापारी व छोटे उद्योजक यांनी राज्यात एकत्रितपणे भाजपचे सरकार बनिण्याचं काम केलं. मात्र, या सर्वांची आणि त्यांच्या लोकप्रतिनीधींची सातत्याने उपेक्षा होत आहे, त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं सैनी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाPoliticsराजकारण