शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

Mann Ki Baat: हिंसा कुठल्याही समस्येवरचा उपाय नाही - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 05:05 IST

‘खेलो इंडिया’ आणि जलसंवर्धन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

नवी दिल्ली : ‘आपण एकविसाव्या शतकात आहोत. हे ज्ञान-विज्ञानाचे आणि लोकशाहीचे यूग आहे. हिंसा हा कुठल्याही समस्येवर उपाय नाही. चर्चा आणि शांततेच्या माध्यमातूनच समस्येचे निराकरण होऊ शकते. त्यामुळे काही शस्त्राच्या जोरावर समस्येवरचे समाधान शोधणाऱ्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात’च्या माध्यमातून केले.

‘अलीकडेच अतिरेकी संघटनांच्या ६०० लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले आहे. काही कारणांनी शस्त्र हाती घेणारे हे लोक आता मुख्य प्रवाहात परतले आहेत. चर्चेतून मार्ग निघू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसला आहे,’ असेही पंतप्रधान म्हणाले. जगाला भारताकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपण नक्कीच प्राप्त करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘खेलो इंडिया’ आणि जलसंवर्धन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. ‘आसाममध्ये आयोजित ‘खेलो इंडिया’त सहा हजार खेळाडूंनी सहभाग घेतला आणि त्यात ८० विक्रम मोडीत निघाले. यात सर्वाधिक विक्रम मुलींच्या नावावर आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. या माध्यमातून ३ हजार २०० खेळाडूंनी पुढे वाटचाल केली असून त्यांच्या कथाही प्रेरणादायी आहेत.’ स्वच्छता अभियानानंतर लोकसहभागाची भावना आता जल संवर्धनाच्या क्षेत्रातही वाढत आहे. त्यासाठी अनेक व्यापक आणि नवे प्रयत्न देशात सुरू आहेत. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती यात सहभाग घेत आहे, असेही ते म्हणाले.ब्रू आदिवासींचा उल्लेख‘अलीकडेच देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. १९९७मध्ये वांशिक संघर्षामुळे ब्रू आदिवासींना मिझोराम सोडावे लागले होते. त्यांना त्रिपुरात शरणार्थी म्हणून ठेवण्यात आले. २३ वर्षांपर्यंत मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. कित्येक सरकार आले आणि गेले, पण त्यांच्या समस्यांची दखल घेतली नाही. तरीही त्यांचा भारतीय संविधानावर विश्वास होता. आता त्यांना त्रिपुरा येथे जागा आणि घर देण्यात येईल. त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे,’ याचाही पंतप्रधानांनी आवर्जुन उल्लेख केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी