शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

Mann Ki Baat: हिंसा कुठल्याही समस्येवरचा उपाय नाही - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 05:05 IST

‘खेलो इंडिया’ आणि जलसंवर्धन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

नवी दिल्ली : ‘आपण एकविसाव्या शतकात आहोत. हे ज्ञान-विज्ञानाचे आणि लोकशाहीचे यूग आहे. हिंसा हा कुठल्याही समस्येवर उपाय नाही. चर्चा आणि शांततेच्या माध्यमातूनच समस्येचे निराकरण होऊ शकते. त्यामुळे काही शस्त्राच्या जोरावर समस्येवरचे समाधान शोधणाऱ्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात’च्या माध्यमातून केले.

‘अलीकडेच अतिरेकी संघटनांच्या ६०० लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले आहे. काही कारणांनी शस्त्र हाती घेणारे हे लोक आता मुख्य प्रवाहात परतले आहेत. चर्चेतून मार्ग निघू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसला आहे,’ असेही पंतप्रधान म्हणाले. जगाला भारताकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपण नक्कीच प्राप्त करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘खेलो इंडिया’ आणि जलसंवर्धन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. ‘आसाममध्ये आयोजित ‘खेलो इंडिया’त सहा हजार खेळाडूंनी सहभाग घेतला आणि त्यात ८० विक्रम मोडीत निघाले. यात सर्वाधिक विक्रम मुलींच्या नावावर आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. या माध्यमातून ३ हजार २०० खेळाडूंनी पुढे वाटचाल केली असून त्यांच्या कथाही प्रेरणादायी आहेत.’ स्वच्छता अभियानानंतर लोकसहभागाची भावना आता जल संवर्धनाच्या क्षेत्रातही वाढत आहे. त्यासाठी अनेक व्यापक आणि नवे प्रयत्न देशात सुरू आहेत. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती यात सहभाग घेत आहे, असेही ते म्हणाले.ब्रू आदिवासींचा उल्लेख‘अलीकडेच देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. १९९७मध्ये वांशिक संघर्षामुळे ब्रू आदिवासींना मिझोराम सोडावे लागले होते. त्यांना त्रिपुरात शरणार्थी म्हणून ठेवण्यात आले. २३ वर्षांपर्यंत मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. कित्येक सरकार आले आणि गेले, पण त्यांच्या समस्यांची दखल घेतली नाही. तरीही त्यांचा भारतीय संविधानावर विश्वास होता. आता त्यांना त्रिपुरा येथे जागा आणि घर देण्यात येईल. त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे,’ याचाही पंतप्रधानांनी आवर्जुन उल्लेख केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी