शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 05:45 IST

आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : “श्रोते हेच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. या रेडिओ कार्यक्रमाने हे सिद्ध केले आहे की, देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी किती भुकेले आहेत. सकारात्मक गोष्टी आणि प्रेरणादायी उदाहरणे त्यांना खूप आवडतात,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.

आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. या कार्यक्रमाच्या दीर्घ प्रवासात असे अनेक टप्पे आहेत, जे ते कधीही विसरू शकत नाहीत. आमच्या प्रवासात असे अनेक सोबती आहेत, ज्यांच्याकडून आम्हाला सतत सहकार्य मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी माहिती दिली.

मन की बात’ने ते खाेटे ठरवले‘मन की बात’चे श्रोते हेच खरे सूत्रधार आहेत. कार्यक्रमात मसालेदार आणि नकारात्मक विषय असल्याशिवाय त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा एक समज सर्वसाधारणपणे निर्माण झाला आहे; पण ‘मन की बात’ने तो खोटा ठरवला, असे ते म्हणाले.

एक पेड माँ के नामn“माझ्यासाठी ‘मन की बात’ची ही संपूर्ण प्रक्रिया मंदिरात जाऊन देवदर्शनासारखी आहे,” असे सांगत मोदी यांनी आभार मानले.nपंतप्रधान मोदींनी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, ‘एक पेड माँ के नाम’ आणि स्वच्छता अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. बायडेन यांनी ३०० वस्तू परत केल्याअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जवळपास ३०० प्राचीन वस्तू भारताला परत केल्या. जेव्हा लोक त्यांच्या वारशाचा अभिमान बाळगू लागतात, तेव्हा जग त्यांच्या भावनांचा आदर करते. दहा वर्षांत विविध देशांनी भारतातील अनेक प्राचीन वस्तू परत केल्या आहेत.

भारत बनला जगात निर्मितीचे ‘पॉवरहाउस’nभारत आज जगातील एक उत्पादन शक्ती केंद्र बनला आहे आणि सरकार जागतिक दर्जाच्या वस्तूंच्या निर्मितीसाठी काम करत असल्याने सर्व देशांच्या नजरा आमच्याकडे आहेत.nस्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावरही भर देत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. n‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत असून, प्रत्येक क्षेत्रात निर्यात वाढत आहे आणि थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) झालेली वाढ हा त्याच्या यशाचा पुरावा आहे, यामुळे स्थानिक उत्पादकांना मोठी मदत झाली.nआगामी सणासुदीच्या काळात स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

टॅग्स :Man ki Baatमन की बात