शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 05:45 IST

आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : “श्रोते हेच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. या रेडिओ कार्यक्रमाने हे सिद्ध केले आहे की, देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी किती भुकेले आहेत. सकारात्मक गोष्टी आणि प्रेरणादायी उदाहरणे त्यांना खूप आवडतात,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.

आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. या कार्यक्रमाच्या दीर्घ प्रवासात असे अनेक टप्पे आहेत, जे ते कधीही विसरू शकत नाहीत. आमच्या प्रवासात असे अनेक सोबती आहेत, ज्यांच्याकडून आम्हाला सतत सहकार्य मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी माहिती दिली.

मन की बात’ने ते खाेटे ठरवले‘मन की बात’चे श्रोते हेच खरे सूत्रधार आहेत. कार्यक्रमात मसालेदार आणि नकारात्मक विषय असल्याशिवाय त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा एक समज सर्वसाधारणपणे निर्माण झाला आहे; पण ‘मन की बात’ने तो खोटा ठरवला, असे ते म्हणाले.

एक पेड माँ के नामn“माझ्यासाठी ‘मन की बात’ची ही संपूर्ण प्रक्रिया मंदिरात जाऊन देवदर्शनासारखी आहे,” असे सांगत मोदी यांनी आभार मानले.nपंतप्रधान मोदींनी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, ‘एक पेड माँ के नाम’ आणि स्वच्छता अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. बायडेन यांनी ३०० वस्तू परत केल्याअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जवळपास ३०० प्राचीन वस्तू भारताला परत केल्या. जेव्हा लोक त्यांच्या वारशाचा अभिमान बाळगू लागतात, तेव्हा जग त्यांच्या भावनांचा आदर करते. दहा वर्षांत विविध देशांनी भारतातील अनेक प्राचीन वस्तू परत केल्या आहेत.

भारत बनला जगात निर्मितीचे ‘पॉवरहाउस’nभारत आज जगातील एक उत्पादन शक्ती केंद्र बनला आहे आणि सरकार जागतिक दर्जाच्या वस्तूंच्या निर्मितीसाठी काम करत असल्याने सर्व देशांच्या नजरा आमच्याकडे आहेत.nस्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावरही भर देत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. n‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत असून, प्रत्येक क्षेत्रात निर्यात वाढत आहे आणि थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) झालेली वाढ हा त्याच्या यशाचा पुरावा आहे, यामुळे स्थानिक उत्पादकांना मोठी मदत झाली.nआगामी सणासुदीच्या काळात स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

टॅग्स :Man ki Baatमन की बात