शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 05:45 IST

आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : “श्रोते हेच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. या रेडिओ कार्यक्रमाने हे सिद्ध केले आहे की, देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी किती भुकेले आहेत. सकारात्मक गोष्टी आणि प्रेरणादायी उदाहरणे त्यांना खूप आवडतात,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.

आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. या कार्यक्रमाच्या दीर्घ प्रवासात असे अनेक टप्पे आहेत, जे ते कधीही विसरू शकत नाहीत. आमच्या प्रवासात असे अनेक सोबती आहेत, ज्यांच्याकडून आम्हाला सतत सहकार्य मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी माहिती दिली.

मन की बात’ने ते खाेटे ठरवले‘मन की बात’चे श्रोते हेच खरे सूत्रधार आहेत. कार्यक्रमात मसालेदार आणि नकारात्मक विषय असल्याशिवाय त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा एक समज सर्वसाधारणपणे निर्माण झाला आहे; पण ‘मन की बात’ने तो खोटा ठरवला, असे ते म्हणाले.

एक पेड माँ के नामn“माझ्यासाठी ‘मन की बात’ची ही संपूर्ण प्रक्रिया मंदिरात जाऊन देवदर्शनासारखी आहे,” असे सांगत मोदी यांनी आभार मानले.nपंतप्रधान मोदींनी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, ‘एक पेड माँ के नाम’ आणि स्वच्छता अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. बायडेन यांनी ३०० वस्तू परत केल्याअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जवळपास ३०० प्राचीन वस्तू भारताला परत केल्या. जेव्हा लोक त्यांच्या वारशाचा अभिमान बाळगू लागतात, तेव्हा जग त्यांच्या भावनांचा आदर करते. दहा वर्षांत विविध देशांनी भारतातील अनेक प्राचीन वस्तू परत केल्या आहेत.

भारत बनला जगात निर्मितीचे ‘पॉवरहाउस’nभारत आज जगातील एक उत्पादन शक्ती केंद्र बनला आहे आणि सरकार जागतिक दर्जाच्या वस्तूंच्या निर्मितीसाठी काम करत असल्याने सर्व देशांच्या नजरा आमच्याकडे आहेत.nस्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावरही भर देत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. n‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत असून, प्रत्येक क्षेत्रात निर्यात वाढत आहे आणि थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) झालेली वाढ हा त्याच्या यशाचा पुरावा आहे, यामुळे स्थानिक उत्पादकांना मोठी मदत झाली.nआगामी सणासुदीच्या काळात स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

टॅग्स :Man ki Baatमन की बात