शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

Mann Ki Baat: यंदाचा गणेशोत्सव 'असा' साजरा व्हावा; मोदींचं गणेश भक्तांना खास आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:55 PM

मन की बातमधून मोदींचा देशवासीयांशी संवाद; विविध विषयांवर पंतप्रधानांचं भाष्य

नवी दिल्ली: कोरोना संकट, सीमेवरील वाढता तणाव या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधला. २०२० वर्ष आव्हानात्मक आहे. मात्र आपण सर्व आव्हानांचा हिमतीनं मुकाबला करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सध्या देश अनलॉक होत आहे. मात्र सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा 'आत्मनिर्भर भारत'चा पुनरुच्चार केला.देशात मान्सूनचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात आपण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पावलं उचलायला हवीत, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी गणेश भक्तांना विशेष आवाहन केलं. 'सध्या अनेक ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. यंदाचा गणेशोत्सव आपण पर्यावरणपूरक करू शकतो का? आपण  केवळ पर्यावरणस्नेही मूर्तींची पूजा करू शकतो का?,' अशा शब्दांत मोदींनी इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचा आग्रह धरला. विसर्जनानंतर नदी, तलावातील पाणी प्रदूषित करणाऱ्या, जलचरांसाठी धोका ठरणाऱ्या मूर्तींचा वापर आपण थांबवू शकतो का?, असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला. तुम्ही माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता राज्यातील बऱ्याचशा मंडळांनी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मोठ्या मंडळांनी कमी उंचीची मूर्ती आणण्याचा निर्धार केला आहे. पाद्यपूजन, आगमन मिरवणूक रद्द करणाऱ्या मंडळांची संख्यादेखील मोठी आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी