शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

Mann Ki Baat: यंदाचा गणेशोत्सव 'असा' साजरा व्हावा; मोदींचं गणेश भक्तांना खास आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 12:58 IST

मन की बातमधून मोदींचा देशवासीयांशी संवाद; विविध विषयांवर पंतप्रधानांचं भाष्य

नवी दिल्ली: कोरोना संकट, सीमेवरील वाढता तणाव या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधला. २०२० वर्ष आव्हानात्मक आहे. मात्र आपण सर्व आव्हानांचा हिमतीनं मुकाबला करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सध्या देश अनलॉक होत आहे. मात्र सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा 'आत्मनिर्भर भारत'चा पुनरुच्चार केला.देशात मान्सूनचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात आपण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पावलं उचलायला हवीत, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी गणेश भक्तांना विशेष आवाहन केलं. 'सध्या अनेक ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. यंदाचा गणेशोत्सव आपण पर्यावरणपूरक करू शकतो का? आपण  केवळ पर्यावरणस्नेही मूर्तींची पूजा करू शकतो का?,' अशा शब्दांत मोदींनी इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचा आग्रह धरला. विसर्जनानंतर नदी, तलावातील पाणी प्रदूषित करणाऱ्या, जलचरांसाठी धोका ठरणाऱ्या मूर्तींचा वापर आपण थांबवू शकतो का?, असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला. तुम्ही माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता राज्यातील बऱ्याचशा मंडळांनी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मोठ्या मंडळांनी कमी उंचीची मूर्ती आणण्याचा निर्धार केला आहे. पाद्यपूजन, आगमन मिरवणूक रद्द करणाऱ्या मंडळांची संख्यादेखील मोठी आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी