शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मोदींचे गुरु सावरकरांनीच देशाचं धर्माच्या आधारे विभाजन केले, मणिशंकर अय्यर यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 09:07 IST

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मणिशंकर अय्यर एका आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त पाकिस्तानमध्ये गेले आहेत. यावेळी त्यांनी भारतातील सध्याची परिस्थिती असामान्य असल्याचे सांगितले. शिवाय ''विनायक दामोदर सावरकर यांनी 1923 मध्ये हिंदुत्व या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला, या शब्दाचा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथात नव्हता. त्यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले. द्विराष्ट्राची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती आणि त्यांचेच समर्थक सध्या भारतात सत्तेत आहेत'', असे वादग्रस्त विधान मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. लाहोरमधील एका कार्यक्रमात मणिशंकर यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले. वादग्रस्त विधान करण्याची मणिशंकर यांची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आक्षेपार्ह विधान करत वाद निर्माण केले आहेत. 

दरम्यान, रविवारी (6 मे) त्यांनी मोहम्मद अली जिना यांचे कौतुक केले होते. यामुळे भाजपाने अय्यर यांच्यावर प्रचंड टीका केली. यावर त्यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले की, ''मी जिना यांचा उल्लेख कायदे आझम म्हणून केला. त्यावर मला पत्रकार विचारतात तुम्ही जिना यांचे कौतुक कसे काय केले?. मग पाकिस्तानमध्ये राहणारे अनेक जण गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा करतात. मग ते देशभक्त नाहीत का'', असा उलट प्रश्नच त्यांनी उपस्थित केला.

सोबतच अलिगड मुस्लिम युनिर्व्हसिटीतील जिना यांचा फोटो सरकारी गुंडांनी हटवल्याचं सांगतदेखील त्यांनी भाजपावर टीका केली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मणिकशंकर अय्यर यांच्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसवर गुजरात निवडणुकीप्रमाणे कर्नाटक निवडणुकीतही पाकिस्तानला सहभागी केल्याचा आरोप केला आहे.दरम्यान,  गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींबाबत अपशब्दांचा वापर केल्यानं काँग्रेसनं कारवाई करत मणिशंकर अय्यर यांची पार्टीतून हकालपट्टी केली.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर