शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देशाला जाहिरातबाजीची नव्हे, कोरोना लसीची गरज; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:23 IST

दिल्लीतील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण मोहिमेवरुन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कोरोना विरोधी लस हाच आहे.

दिल्लीतील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण मोहिमेवरुन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कोरोना विरोधी लस हाच आहे. अनेक देशांनी आपल्या देशातील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देत लसीकरण वेगान करुन देशाला 'मास्क फ्री' देखील घोषीत केलं आहे. बहुतेक देशांनी आपल्या देशात लस तयार केली, इतर देशांकडूनही विकत घेतली आणि देशातील नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं. जर केंद्र सरकारनं ठरवलं तर संपूर्ण देशात वेगात लसीकरण होऊ शकतं. पण आपल्या देशात कोरोना लसीचंच संकट निर्माण झालंय, अशी टीका मनीष सिसोदिया यांनी केली आहे.

"पंतप्रधानांनी २१ जूनपासून मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. जाहिरातबाजी केली पण जून महिन्यात लसीचा साठा काही राज्यांना मिळालेला नाही. तर जुलै महिन्यात केळ १५ लाख लसीचे डोस दिले जाणार आहेत. यात कसं काम पूर्ण होईल? तुम्ही जगातील सर्वात मोठं कोरोना लसीकरण मोहिमेचा डंका पिटता पण व्यवस्थापनाच्या पातळीवर शून्य कामगिरी दाखवता असं कसं चालेल? केवळ जाहिरातबाजी देशाला नकोय, देशाला कोरोना विरोधी लसींची गरज नाही", असा हल्लाबोल मनीष सिसोदिया यांनी केला. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

दिल्लीला २ कोटी ३० लाख कोरोना लसीचे डोसची आवश्यकता आहे. सध्याच्या वेगानं जर लसीकरण सुरू राहिलं तर आणखी १५ ते १६ महिन्यांचा कालावधी लागेल. त्यापद्धतीनं तर जगातील सर्वात नियोजन शून्य लसीकरण मोहीम म्हणून भारताच्या लसीकरण मोहिमेची ओळख निर्माण होईल. देशात कोरोना लसींचा साठा उपलब्ध नाहीय, पण जाहिरातबाजी मात्र मोठ्या प्रमाणावर केली जातेय. जाहिरातबाजीवर खर्च केलेला पैसा जर लस उत्पादनासाठी खर्च केला असता तर इतक्यात सर्वांसाठी लसीचे डोस उपलब्ध झाले असते, असा टोला देखील सिसोदिया यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. 

दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांवर जाहिरातबाजी करण्यासाठीचा दबाव केंद्राकडून आणला जात असल्याचा आरोप देखील सिसोदिया यांनी यावेळी केला. पुढील दोन महिने आम्हाला २ कोटी ३० लाख कोरोना लसीचे डोस द्या आम्ही दोन महिन्यात संपूर्ण दिल्लीकरांचं लसीकरण पूर्ण करुन दाखवतो. मग मी स्वत: दिल्ली सरकारच्या वतीनं केंद्राचे आभार व्यक्त करणारी जाहिरात प्रसिद्ध करेन, असंही सिसोदिया म्हणाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAAPआप