शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 08:19 IST

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सेनापती (मणिपूर) : काँग्रेस मणिपूरला पुन्हा शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण बनवू इच्छिते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी सोमवारी येथे सांगितले. आपला पक्ष राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही ते म्हणाले. 

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जेव्हा राहुल यांची बस येथील गजबजलेल्या भागातून गेली, तेव्हा बहुतांश करून महिला आणि मुलांसह अनेक लोकांनी यात्रा मार्गावर रांगेत उभे राहून राहुल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सेनापती येथे बसच्या टपावर उभे राहून त्यांनी लोकांना संबोधित केले.

‘याआधी काँग्रेसने कन्याकुमारी ते  काश्मीर अशी यात्रा काढली. लोकांना एकजूट करणे हा या यात्रेचा उद्देश होता. ही यात्रा खूप यशस्वी ठरली. यादरम्यान आपण चार हजार कि.मी. चाललो’, असे ते म्हणाले. 

तुमच्या वेदनांची जाणीवआम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणखी एक यात्रा करायची होती व आम्ही ठरवले की मणिपूरपासून सुरुवात करणे ही सर्वांत प्रभावी गोष्ट असेल. कारण, यामुळे मणिपूरचे लोक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे भारतीय जनतेला कळू शकेल. तुम्ही सोसलेल्या वेदनांची मला  जाणीव आहे,  असे राहुल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा