शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 08:19 IST

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सेनापती (मणिपूर) : काँग्रेस मणिपूरला पुन्हा शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण बनवू इच्छिते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी सोमवारी येथे सांगितले. आपला पक्ष राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही ते म्हणाले. 

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जेव्हा राहुल यांची बस येथील गजबजलेल्या भागातून गेली, तेव्हा बहुतांश करून महिला आणि मुलांसह अनेक लोकांनी यात्रा मार्गावर रांगेत उभे राहून राहुल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सेनापती येथे बसच्या टपावर उभे राहून त्यांनी लोकांना संबोधित केले.

‘याआधी काँग्रेसने कन्याकुमारी ते  काश्मीर अशी यात्रा काढली. लोकांना एकजूट करणे हा या यात्रेचा उद्देश होता. ही यात्रा खूप यशस्वी ठरली. यादरम्यान आपण चार हजार कि.मी. चाललो’, असे ते म्हणाले. 

तुमच्या वेदनांची जाणीवआम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणखी एक यात्रा करायची होती व आम्ही ठरवले की मणिपूरपासून सुरुवात करणे ही सर्वांत प्रभावी गोष्ट असेल. कारण, यामुळे मणिपूरचे लोक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे भारतीय जनतेला कळू शकेल. तुम्ही सोसलेल्या वेदनांची मला  जाणीव आहे,  असे राहुल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा