शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल घेऊन रस्त्यावर उतरल्या महिला, केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 11:10 IST

Manipur Violence : ज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला.

मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात महिला आंदोलकांनी राजधानी इम्फाळमध्ये मशाल रॅली काढली. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला. तेंगनोउपल जिल्ह्यातील भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह येथे केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्यानंतर ही रॅली काढण्यात आली.

मीरा पायबी संघटनेशी संबंधित या महिला मालोम, कीशमपत आणि क्वाकीथेल भागातून आल्या होत्या आणि त्यांनी रॅलीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी आंदोलक महिलांनी मुख्यमंत्री सचिवालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं.

SOO करार रद्द करा, आंदोलक महिलांची मागणी

आंदोलकांनी मोरेह आणि मणिपूरच्या इतर भागात अलीकडील गोळीबाराच्या घटनांचा निषेध केला आणि अतिरेकी संघटनांसोबत सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SOO) करार रद्द करण्याची मागणी केली. काही गटांशी राजकीय चर्चा सुरू करण्याच्या उद्देशाने 22 ऑगस्ट 2008 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

17 जानेवारीला पहाटे 4 वाजता मोरेह येथील चिकीम गावातील डोंगराळ भागात हल्ला केला. हा हल्ला झाला तेव्हा जवान झोपले होते. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारला टेंग्नॉपालमध्ये अशांततेच्या शक्यतेची माहिती मिळाली होती, त्यानुसार सरकारने 16 जानेवारीच्या रात्री 12 वाजता या भागात कर्फ्यू लागू केला होता. त्यानंतर हल्ला झाला त्यामुळे राज्य सरकारविरोधात प्रचंड नाराजी पसरली होती.

मणिपूर हिंसाचारात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू, हजारो लोक बेघर 

गेल्या वर्षी 3 मे रोजी, खोरे-बहुल मैतेई आणि टेकडी-बहुल कुकी यांच्यात जातीय संघर्ष झाला, त्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. या हिंसाचारात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारWomenमहिला