शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल घेऊन रस्त्यावर उतरल्या महिला, केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 11:10 IST

Manipur Violence : ज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला.

मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात महिला आंदोलकांनी राजधानी इम्फाळमध्ये मशाल रॅली काढली. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला. तेंगनोउपल जिल्ह्यातील भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह येथे केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्यानंतर ही रॅली काढण्यात आली.

मीरा पायबी संघटनेशी संबंधित या महिला मालोम, कीशमपत आणि क्वाकीथेल भागातून आल्या होत्या आणि त्यांनी रॅलीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी आंदोलक महिलांनी मुख्यमंत्री सचिवालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं.

SOO करार रद्द करा, आंदोलक महिलांची मागणी

आंदोलकांनी मोरेह आणि मणिपूरच्या इतर भागात अलीकडील गोळीबाराच्या घटनांचा निषेध केला आणि अतिरेकी संघटनांसोबत सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SOO) करार रद्द करण्याची मागणी केली. काही गटांशी राजकीय चर्चा सुरू करण्याच्या उद्देशाने 22 ऑगस्ट 2008 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

17 जानेवारीला पहाटे 4 वाजता मोरेह येथील चिकीम गावातील डोंगराळ भागात हल्ला केला. हा हल्ला झाला तेव्हा जवान झोपले होते. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारला टेंग्नॉपालमध्ये अशांततेच्या शक्यतेची माहिती मिळाली होती, त्यानुसार सरकारने 16 जानेवारीच्या रात्री 12 वाजता या भागात कर्फ्यू लागू केला होता. त्यानंतर हल्ला झाला त्यामुळे राज्य सरकारविरोधात प्रचंड नाराजी पसरली होती.

मणिपूर हिंसाचारात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू, हजारो लोक बेघर 

गेल्या वर्षी 3 मे रोजी, खोरे-बहुल मैतेई आणि टेकडी-बहुल कुकी यांच्यात जातीय संघर्ष झाला, त्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. या हिंसाचारात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारWomenमहिला