शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल घेऊन रस्त्यावर उतरल्या महिला, केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 11:10 IST

Manipur Violence : ज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला.

मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात महिला आंदोलकांनी राजधानी इम्फाळमध्ये मशाल रॅली काढली. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला. तेंगनोउपल जिल्ह्यातील भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह येथे केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्यानंतर ही रॅली काढण्यात आली.

मीरा पायबी संघटनेशी संबंधित या महिला मालोम, कीशमपत आणि क्वाकीथेल भागातून आल्या होत्या आणि त्यांनी रॅलीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी आंदोलक महिलांनी मुख्यमंत्री सचिवालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं.

SOO करार रद्द करा, आंदोलक महिलांची मागणी

आंदोलकांनी मोरेह आणि मणिपूरच्या इतर भागात अलीकडील गोळीबाराच्या घटनांचा निषेध केला आणि अतिरेकी संघटनांसोबत सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SOO) करार रद्द करण्याची मागणी केली. काही गटांशी राजकीय चर्चा सुरू करण्याच्या उद्देशाने 22 ऑगस्ट 2008 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

17 जानेवारीला पहाटे 4 वाजता मोरेह येथील चिकीम गावातील डोंगराळ भागात हल्ला केला. हा हल्ला झाला तेव्हा जवान झोपले होते. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारला टेंग्नॉपालमध्ये अशांततेच्या शक्यतेची माहिती मिळाली होती, त्यानुसार सरकारने 16 जानेवारीच्या रात्री 12 वाजता या भागात कर्फ्यू लागू केला होता. त्यानंतर हल्ला झाला त्यामुळे राज्य सरकारविरोधात प्रचंड नाराजी पसरली होती.

मणिपूर हिंसाचारात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू, हजारो लोक बेघर 

गेल्या वर्षी 3 मे रोजी, खोरे-बहुल मैतेई आणि टेकडी-बहुल कुकी यांच्यात जातीय संघर्ष झाला, त्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. या हिंसाचारात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारWomenमहिला