शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर आम्हाला भाजपासोबतची आघाडी तोडावी लागेल; मित्रपक्षाने का दिला सूचक इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 16:11 IST

सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल

नवी दिल्ली - मणिपूरमध्ये गेल्या दिड महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. याठिकाणी अथक प्रयत्नानंतरही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले नाही. त्याचवेळी नॅशनल पीपुल्स पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वाई जॉयकुमार सिंह यांनी मोठे विधान केले आहे. जर आगामी काळात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर भाजपासोबतच्या आघाडीवर आम्हाला फेरविचार करावा लागेल. आम्ही गप्प बसून हे पाहू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. 

जॉयकुमार सिंह म्हणाले की, मणिपूरमध्ये कलम ३५५ लागू आहे. त्यामुळे येथील लोकांची सुरक्षा करणे राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु हिंसा रोखण्यासाठी कुठलीही योजना बनवली जात नाही. सध्या परिस्थिती सुधारेल अशी चिन्हे नाहीत. राज्यातील सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे. केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. त्यांच्या घरावर बॉम्ब फेकले. आज आर के रंजन यांना निशाणा बनवले. उद्या सर्व आमदार, भाजपा मंत्री आणि सहकारी पक्षालाही टार्गेट केले जाऊ शकते अशी भीती त्यांनी वर्तवली. 

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही. मणिपूरमध्ये कुणाचे नियंत्रण आहे केंद्राचे की राज्याचे हा प्रश्न लोक विचारत आहेत. राज्यात संभ्रम आहे. कोण प्रभारी आहे हे स्पष्ट व्हायला हवे अन्यथा स्थिती जैसे थे राहील. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत काय पाऊले उचलायला हवीत ते सांगितले आहे. सुरुवातीलाच हे प्रकरण हाताळायला हवे होते. योग्य योजना बनवा. सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल असं NPP चे उपाध्यक्ष जॉयकुमार सिंह यांनी सूचक इशारा दिला. 

हिंसेत आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यूमणिपूरमध्ये एक महिन्यापूर्वी मैतेई आणि कुकी समुदायात वाद उफाळून आला आणि त्यातून हिंसा भडकली. या जातीय हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मैतेई समुदाय अनुसूचित जातीचा(ST) दर्जा देण्याची मागणी करत आहे. तर त्याविरोधात डोंगराळ भागात आदिवासी एकजुट मोर्चा काढला जात आहे. मणिपूरमध्ये मैतेई समाजाची लोकसंख्या ५३ टक्के आहे आणि बहुतांश इंफाल खोऱ्यात ते राहतात. आदिवासी नागा आणि कुकी समुदायाची लोकसंख्या ४० टक्के आहे जे पहाडी जिल्ह्यात राहतात. राज्य सरकारने चुकीच्या अफवा रोखण्यासाठी ११ जिल्ह्यात कर्फ्यू लावला आहे. त्याचसोबत इंटरनेट सेवाही खंडीत केली आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा