शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

...तर आम्हाला भाजपासोबतची आघाडी तोडावी लागेल; मित्रपक्षाने का दिला सूचक इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 16:11 IST

सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल

नवी दिल्ली - मणिपूरमध्ये गेल्या दिड महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. याठिकाणी अथक प्रयत्नानंतरही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले नाही. त्याचवेळी नॅशनल पीपुल्स पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वाई जॉयकुमार सिंह यांनी मोठे विधान केले आहे. जर आगामी काळात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर भाजपासोबतच्या आघाडीवर आम्हाला फेरविचार करावा लागेल. आम्ही गप्प बसून हे पाहू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. 

जॉयकुमार सिंह म्हणाले की, मणिपूरमध्ये कलम ३५५ लागू आहे. त्यामुळे येथील लोकांची सुरक्षा करणे राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु हिंसा रोखण्यासाठी कुठलीही योजना बनवली जात नाही. सध्या परिस्थिती सुधारेल अशी चिन्हे नाहीत. राज्यातील सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे. केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. त्यांच्या घरावर बॉम्ब फेकले. आज आर के रंजन यांना निशाणा बनवले. उद्या सर्व आमदार, भाजपा मंत्री आणि सहकारी पक्षालाही टार्गेट केले जाऊ शकते अशी भीती त्यांनी वर्तवली. 

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही. मणिपूरमध्ये कुणाचे नियंत्रण आहे केंद्राचे की राज्याचे हा प्रश्न लोक विचारत आहेत. राज्यात संभ्रम आहे. कोण प्रभारी आहे हे स्पष्ट व्हायला हवे अन्यथा स्थिती जैसे थे राहील. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत काय पाऊले उचलायला हवीत ते सांगितले आहे. सुरुवातीलाच हे प्रकरण हाताळायला हवे होते. योग्य योजना बनवा. सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल असं NPP चे उपाध्यक्ष जॉयकुमार सिंह यांनी सूचक इशारा दिला. 

हिंसेत आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यूमणिपूरमध्ये एक महिन्यापूर्वी मैतेई आणि कुकी समुदायात वाद उफाळून आला आणि त्यातून हिंसा भडकली. या जातीय हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मैतेई समुदाय अनुसूचित जातीचा(ST) दर्जा देण्याची मागणी करत आहे. तर त्याविरोधात डोंगराळ भागात आदिवासी एकजुट मोर्चा काढला जात आहे. मणिपूरमध्ये मैतेई समाजाची लोकसंख्या ५३ टक्के आहे आणि बहुतांश इंफाल खोऱ्यात ते राहतात. आदिवासी नागा आणि कुकी समुदायाची लोकसंख्या ४० टक्के आहे जे पहाडी जिल्ह्यात राहतात. राज्य सरकारने चुकीच्या अफवा रोखण्यासाठी ११ जिल्ह्यात कर्फ्यू लावला आहे. त्याचसोबत इंटरनेट सेवाही खंडीत केली आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा