शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

...तर आम्हाला भाजपासोबतची आघाडी तोडावी लागेल; मित्रपक्षाने का दिला सूचक इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 16:11 IST

सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल

नवी दिल्ली - मणिपूरमध्ये गेल्या दिड महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. याठिकाणी अथक प्रयत्नानंतरही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले नाही. त्याचवेळी नॅशनल पीपुल्स पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वाई जॉयकुमार सिंह यांनी मोठे विधान केले आहे. जर आगामी काळात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर भाजपासोबतच्या आघाडीवर आम्हाला फेरविचार करावा लागेल. आम्ही गप्प बसून हे पाहू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. 

जॉयकुमार सिंह म्हणाले की, मणिपूरमध्ये कलम ३५५ लागू आहे. त्यामुळे येथील लोकांची सुरक्षा करणे राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु हिंसा रोखण्यासाठी कुठलीही योजना बनवली जात नाही. सध्या परिस्थिती सुधारेल अशी चिन्हे नाहीत. राज्यातील सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे. केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. त्यांच्या घरावर बॉम्ब फेकले. आज आर के रंजन यांना निशाणा बनवले. उद्या सर्व आमदार, भाजपा मंत्री आणि सहकारी पक्षालाही टार्गेट केले जाऊ शकते अशी भीती त्यांनी वर्तवली. 

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही. मणिपूरमध्ये कुणाचे नियंत्रण आहे केंद्राचे की राज्याचे हा प्रश्न लोक विचारत आहेत. राज्यात संभ्रम आहे. कोण प्रभारी आहे हे स्पष्ट व्हायला हवे अन्यथा स्थिती जैसे थे राहील. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत काय पाऊले उचलायला हवीत ते सांगितले आहे. सुरुवातीलाच हे प्रकरण हाताळायला हवे होते. योग्य योजना बनवा. सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल असं NPP चे उपाध्यक्ष जॉयकुमार सिंह यांनी सूचक इशारा दिला. 

हिंसेत आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यूमणिपूरमध्ये एक महिन्यापूर्वी मैतेई आणि कुकी समुदायात वाद उफाळून आला आणि त्यातून हिंसा भडकली. या जातीय हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मैतेई समुदाय अनुसूचित जातीचा(ST) दर्जा देण्याची मागणी करत आहे. तर त्याविरोधात डोंगराळ भागात आदिवासी एकजुट मोर्चा काढला जात आहे. मणिपूरमध्ये मैतेई समाजाची लोकसंख्या ५३ टक्के आहे आणि बहुतांश इंफाल खोऱ्यात ते राहतात. आदिवासी नागा आणि कुकी समुदायाची लोकसंख्या ४० टक्के आहे जे पहाडी जिल्ह्यात राहतात. राज्य सरकारने चुकीच्या अफवा रोखण्यासाठी ११ जिल्ह्यात कर्फ्यू लावला आहे. त्याचसोबत इंटरनेट सेवाही खंडीत केली आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा