शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मणिपूरमध्ये काहीतरी मोठं घडणार, अमित शाहा ॲक्शन मोडमध्ये, उच्चस्तरीय बैठकीत दिले असे आदेश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 19:47 IST

Manipur Violence News:

मागच्या जवळपास दोन वर्षांपासून जातीय हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात असला तरी हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

अमित शाह यांनी आज मणिपूरमधील सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अमित शाह यांनी आणि ८ मार्चपर्यंत मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर सर्वसामान्य जनतेला मुक्तपणे ये जा करता यावी, अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेच. तसेच रस्त्यांवर अडथळे आणणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी दिली. या बैठकीला राज्याचे राज्यपाल, गृहसचिवांसह बडे लष्करी अधिकारी उपस्थित होते.

याबरोबच अमित शाह यांनी जबरदस्तीने खंडणी वसुलीच्या प्रकरणांमध्येही कठोर करावाई सुरू ठेवण्याचे आदेश दिल आहेत. याशिवाय मणिपूरला लागून असलेल्या आंततराष्ट्रीय सीमेवर होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी काही एंट्री पॉईंटच्या दोन्ही बाजूंना तार लावण्याचं काम लवकरच पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे. याबरोबरच अमित शाह यांनी आढावा बैठकीमध्ये मणिपूरला व्यसनमुक्त बनवण्यासाठी अमली पदार्थांचा कारभार करणारं जाळं उद्ध्वस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटीबद्ध आहे. तसेच त्यासाठी सर्वतोपरी मदत दिली जात आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकार