शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मणिपूरमध्ये काहीतरी मोठं घडणार, अमित शाहा ॲक्शन मोडमध्ये, उच्चस्तरीय बैठकीत दिले असे आदेश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 19:47 IST

Manipur Violence News:

मागच्या जवळपास दोन वर्षांपासून जातीय हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात असला तरी हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

अमित शाह यांनी आज मणिपूरमधील सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अमित शाह यांनी आणि ८ मार्चपर्यंत मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर सर्वसामान्य जनतेला मुक्तपणे ये जा करता यावी, अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेच. तसेच रस्त्यांवर अडथळे आणणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी दिली. या बैठकीला राज्याचे राज्यपाल, गृहसचिवांसह बडे लष्करी अधिकारी उपस्थित होते.

याबरोबच अमित शाह यांनी जबरदस्तीने खंडणी वसुलीच्या प्रकरणांमध्येही कठोर करावाई सुरू ठेवण्याचे आदेश दिल आहेत. याशिवाय मणिपूरला लागून असलेल्या आंततराष्ट्रीय सीमेवर होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी काही एंट्री पॉईंटच्या दोन्ही बाजूंना तार लावण्याचं काम लवकरच पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे. याबरोबरच अमित शाह यांनी आढावा बैठकीमध्ये मणिपूरला व्यसनमुक्त बनवण्यासाठी अमली पदार्थांचा कारभार करणारं जाळं उद्ध्वस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटीबद्ध आहे. तसेच त्यासाठी सर्वतोपरी मदत दिली जात आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकार