शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 17:44 IST

Manipur violence : मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गुप्तचर अहवालाला हलक्यात घेता येणार नाही.

Manipur violence : हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये आता म्यानमारमधील अतिरेक्यांच्या घुसखोरीमुळे आता चिंता वाढली आहे. शेजारच्या म्यानमारमधून मणिपूरमध्ये ९०० कुकी अतिरेक्यांच्या प्रवेशाबद्दल आणि सशस्त्र ड्रोनच्या वापराबद्दल गुप्तचर अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत शनिवारी सुरक्षा सल्लागारांनी दुजोरा दिला आहे. मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गुप्तचर अहवालाला हलक्यात घेता येणार नाही.

दुसरीकडे, एनडीटीव्हीने उच्च गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दक्षिण मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवरील जिल्ह्यांच्या सर्व वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला आहे. गुरुवारी पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे की, ९०० कुकी अतिरेक्यांनी अलीकडेच ड्रोन-आधारित बॉम्ब, प्रोजेक्टाइल, क्षेपणास्त्रे आणि जंगल युद्धाचे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्यांनी म्यानमारमधून मणिपूरमध्ये प्रवेश केला आहे.

गुप्तचर सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की, कुकी अतिरेकी प्रत्येकी ३० सदस्यांच्या तुकड्यांमध्ये विभागले गेले आहेत आणि सध्या ते वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. ते सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मैतेई गावांवर हल्ले करू शकतात, असेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत कुलदीप सिंह म्हणाले की, हा अहवाल १०० टक्के बरोबर आहे. जोपर्यंत तो चुकीचा सिद्ध होत नाही तोपर्यंत, आम्ही तो १०० टक्के अचूक असल्याचे मानतो, कारण तुम्हाला कोणतेही इंटेलिजन्स इनपुट १०० टक्के अचूक असल्याचे गृहीत धरले पाहिजे आणि त्यासाठी तयार राहिले पाहिजेत.

"म्यानमारमधून पळून येत आहेत कुकी"कुलदीप सिंह पुढे म्हणाले की, म्यानमारमधील चिन प्रांत आणि इतर राज्यांमधील कुकी आणि वांशिक सशस्त्र गट जुंटा यांच्यात संघर्ष होत आहे. त्यांनी देशाचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे, जो पूर्वी जुंटाच्या ताब्यात होता. काही संघर्ष भारतीय सीमेजवळ झाला आहे, त्यामुळे सीमेला लागून असलेल्या भागातील सैनिक पळून भारतात येण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. त्यांचा पाठलाग करताना बिनी प्रांतातील बंडखोरही भारतात घुसण्याच्या प्रयत्न करतात.

काही जिल्हे हाय अलर्टवर१ सप्टेंबरपासून वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत कुलदीप सिंह म्हणाले की, १८ सप्टेंबर रोजी स्ट्रॅटेजिक ऑपरेशन ग्रुपची बैठक झाली आहे. यामध्ये सुरक्षा यंत्रणांना एकत्रितपणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय गुप्तचर अहवालांवरही चर्चा करण्यात आली आहे. गुप्तचर अहवालाबाबत एजन्सीच्या उच्च अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय चुराचंदपूर, फेरजौल, टेंगनोपाल, कमजोंग आणि उखरुल जिल्ह्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार