शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 17:44 IST

Manipur violence : मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गुप्तचर अहवालाला हलक्यात घेता येणार नाही.

Manipur violence : हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये आता म्यानमारमधील अतिरेक्यांच्या घुसखोरीमुळे आता चिंता वाढली आहे. शेजारच्या म्यानमारमधून मणिपूरमध्ये ९०० कुकी अतिरेक्यांच्या प्रवेशाबद्दल आणि सशस्त्र ड्रोनच्या वापराबद्दल गुप्तचर अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत शनिवारी सुरक्षा सल्लागारांनी दुजोरा दिला आहे. मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गुप्तचर अहवालाला हलक्यात घेता येणार नाही.

दुसरीकडे, एनडीटीव्हीने उच्च गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दक्षिण मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवरील जिल्ह्यांच्या सर्व वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला आहे. गुरुवारी पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे की, ९०० कुकी अतिरेक्यांनी अलीकडेच ड्रोन-आधारित बॉम्ब, प्रोजेक्टाइल, क्षेपणास्त्रे आणि जंगल युद्धाचे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्यांनी म्यानमारमधून मणिपूरमध्ये प्रवेश केला आहे.

गुप्तचर सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की, कुकी अतिरेकी प्रत्येकी ३० सदस्यांच्या तुकड्यांमध्ये विभागले गेले आहेत आणि सध्या ते वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. ते सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मैतेई गावांवर हल्ले करू शकतात, असेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत कुलदीप सिंह म्हणाले की, हा अहवाल १०० टक्के बरोबर आहे. जोपर्यंत तो चुकीचा सिद्ध होत नाही तोपर्यंत, आम्ही तो १०० टक्के अचूक असल्याचे मानतो, कारण तुम्हाला कोणतेही इंटेलिजन्स इनपुट १०० टक्के अचूक असल्याचे गृहीत धरले पाहिजे आणि त्यासाठी तयार राहिले पाहिजेत.

"म्यानमारमधून पळून येत आहेत कुकी"कुलदीप सिंह पुढे म्हणाले की, म्यानमारमधील चिन प्रांत आणि इतर राज्यांमधील कुकी आणि वांशिक सशस्त्र गट जुंटा यांच्यात संघर्ष होत आहे. त्यांनी देशाचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे, जो पूर्वी जुंटाच्या ताब्यात होता. काही संघर्ष भारतीय सीमेजवळ झाला आहे, त्यामुळे सीमेला लागून असलेल्या भागातील सैनिक पळून भारतात येण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. त्यांचा पाठलाग करताना बिनी प्रांतातील बंडखोरही भारतात घुसण्याच्या प्रयत्न करतात.

काही जिल्हे हाय अलर्टवर१ सप्टेंबरपासून वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत कुलदीप सिंह म्हणाले की, १८ सप्टेंबर रोजी स्ट्रॅटेजिक ऑपरेशन ग्रुपची बैठक झाली आहे. यामध्ये सुरक्षा यंत्रणांना एकत्रितपणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय गुप्तचर अहवालांवरही चर्चा करण्यात आली आहे. गुप्तचर अहवालाबाबत एजन्सीच्या उच्च अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय चुराचंदपूर, फेरजौल, टेंगनोपाल, कमजोंग आणि उखरुल जिल्ह्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार