शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

भाजपाच्या 9 आमदारांनी मोदी सरकारविरोधात लिहिलं पत्र; 8 जणांनी दुसऱ्या दिवशी मारली पलटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:54 IST

Manipur Violence : पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी दिलेल्या निवेदनात आमदारांनी म्हटलं आहे की, सध्या सरकार आणि प्रशासनावर विश्वास उरलेला नाही.

मणिपूरमधील हिंसाचार शांत होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ठिकाणी अजूनही गोळीबार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री 11.45 वाजता पूर्व मणिपूरमधील थांगजिंग येथे स्वयंचलित शस्त्रांमधून सुमारे 15-20 राऊंड गोळीबार ऐकू आला. गेलजँग आणि सिंगडा येथूनही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान, भाजपाच्या नऊ आमदारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लोकांचा मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यावरील विश्वास उडाला आहे असं सांगितलं.

पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी त्यांना दिलेल्या निवेदनात आमदारांनी म्हटलं आहे की, सध्या सरकार आणि प्रशासनावर विश्वास उरलेला नाही. लोकांचा राज्य सरकारवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. योग्य प्रशासन आणि कायद्याचे पालन करून काम करण्यासाठी काही विशेष उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो जेणेकरून सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा स्थापित होईल. हे निवेदन विरोधी पक्षाच्या आमदारांनी नाही, तर भाजपाच्या आमदारांनी पंतप्रधानांना दिले आहे. 

नऊ आमदारांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जनतेचा पाठिंबा गमावला आहे, हे सर्व मणिपूरचे भाजपा आमदार आहेत आणि त्यात करम श्याम सिंह, राधेश्याम सिंह, निशिकांत सिंह सपम, रघुमणी सिंह एस. ब्रोजेन सिंह, टी रॉबिंद्रो सिंह, एस राजेन सिंह, एस केबी देवी आणि डॉ. वाय. राधेश्याम यांचा समावेश आहे. हे सर्व मैतेई समाजाचे आहेत. राज्यातील मैतेई आणि कुकी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्यमंत्र्यांवर त्यांच्याच समुदायाचे, मैतईचे समर्थन केल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे.

बिरेन सिंह सरकारला अपयशी ठरवणाऱ्या या निवेदनाकडे मणिपूर भाजपामधील असंतोषाचा आणखी एक भाग म्हणून पाहिले जात आहे. 20 मे रोजी, नऊपैकी आठ स्वाक्षरी करणारे आमदार, हे 30 भाजपा आमदारांच्या गटात सामील झाले जे मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, ज्यात त्यांचे जावई राजकुमार इमो सिंह यांचा समावेश आहे. करम श्याम सिंह यांनी तर काही लोक पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मणिपूरचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत, असे विधान केलं. 

एप्रिलमध्ये, करम श्याम यांनी मणिपूर पर्यटन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आरोप केला की, त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. केवळ करम श्यामच नाही तर स्वाक्षरी करणारे तीन इतर - राधेश्याम सिंह, एस ब्रोजेन सिंह आणि रघुमणी सिंह यांनी अप्रत्यक्षपणे बीरेन सिंह यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आणि सरकारमधील विविध प्रशासकीय आणि सल्लागार पदांचा राजीनामा दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा