शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भाजपाच्या 9 आमदारांनी मोदी सरकारविरोधात लिहिलं पत्र; 8 जणांनी दुसऱ्या दिवशी मारली पलटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:54 IST

Manipur Violence : पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी दिलेल्या निवेदनात आमदारांनी म्हटलं आहे की, सध्या सरकार आणि प्रशासनावर विश्वास उरलेला नाही.

मणिपूरमधील हिंसाचार शांत होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ठिकाणी अजूनही गोळीबार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री 11.45 वाजता पूर्व मणिपूरमधील थांगजिंग येथे स्वयंचलित शस्त्रांमधून सुमारे 15-20 राऊंड गोळीबार ऐकू आला. गेलजँग आणि सिंगडा येथूनही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान, भाजपाच्या नऊ आमदारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लोकांचा मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यावरील विश्वास उडाला आहे असं सांगितलं.

पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी त्यांना दिलेल्या निवेदनात आमदारांनी म्हटलं आहे की, सध्या सरकार आणि प्रशासनावर विश्वास उरलेला नाही. लोकांचा राज्य सरकारवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. योग्य प्रशासन आणि कायद्याचे पालन करून काम करण्यासाठी काही विशेष उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो जेणेकरून सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा स्थापित होईल. हे निवेदन विरोधी पक्षाच्या आमदारांनी नाही, तर भाजपाच्या आमदारांनी पंतप्रधानांना दिले आहे. 

नऊ आमदारांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जनतेचा पाठिंबा गमावला आहे, हे सर्व मणिपूरचे भाजपा आमदार आहेत आणि त्यात करम श्याम सिंह, राधेश्याम सिंह, निशिकांत सिंह सपम, रघुमणी सिंह एस. ब्रोजेन सिंह, टी रॉबिंद्रो सिंह, एस राजेन सिंह, एस केबी देवी आणि डॉ. वाय. राधेश्याम यांचा समावेश आहे. हे सर्व मैतेई समाजाचे आहेत. राज्यातील मैतेई आणि कुकी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्यमंत्र्यांवर त्यांच्याच समुदायाचे, मैतईचे समर्थन केल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे.

बिरेन सिंह सरकारला अपयशी ठरवणाऱ्या या निवेदनाकडे मणिपूर भाजपामधील असंतोषाचा आणखी एक भाग म्हणून पाहिले जात आहे. 20 मे रोजी, नऊपैकी आठ स्वाक्षरी करणारे आमदार, हे 30 भाजपा आमदारांच्या गटात सामील झाले जे मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, ज्यात त्यांचे जावई राजकुमार इमो सिंह यांचा समावेश आहे. करम श्याम सिंह यांनी तर काही लोक पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मणिपूरचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत, असे विधान केलं. 

एप्रिलमध्ये, करम श्याम यांनी मणिपूर पर्यटन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आरोप केला की, त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. केवळ करम श्यामच नाही तर स्वाक्षरी करणारे तीन इतर - राधेश्याम सिंह, एस ब्रोजेन सिंह आणि रघुमणी सिंह यांनी अप्रत्यक्षपणे बीरेन सिंह यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आणि सरकारमधील विविध प्रशासकीय आणि सल्लागार पदांचा राजीनामा दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा