शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Manipur Violence : भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, एकाचा मृत्यू; मंत्र्यांच्या घरावर हल्ला, कर्फ्यू लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 10:10 IST

Manipur Violence : मणिपूरमधील बिष्णूपूर आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी आणखी हिंसाचार झाला. या वेगवेगळ्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका राज्यमंत्र्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले.

मणिपूरमध्ये दोन समुदायांमधील रक्तरंजित हिंसाचार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. राज्यातील हिंसाचार थांबत नसल्याने परिस्थिती बिघडत आहे. भारतीय लष्करासह, इतर केंद्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस दल मणिपूरमधील परिस्थिती शांत करण्यासाठी सज्ज आहेत. असे असतानाही मैतई आणि कुकी समाजाचे हिंसक आंदोलक शांत बसायला तयार नाहीत.

मणिपूरमधील बिष्णूपूर आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी आणखी हिंसाचार झाला. या वेगवेगळ्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका राज्यमंत्र्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या सर्व घटनांमुळे राज्यातील बिष्णुपूर, इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम आणि जिरिबाम जिल्ह्यांमध्ये पुढील आदेशापर्यंत कोणतीही शिथिलता न देता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, हिंसाचारात मरण पावलेली व्यक्ती बुधवारी सकाळी थम्नापोकपी पायथ्याशी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले. या व्यक्तीला इम्फाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी, अचानक जमावाने निंगथौखोंग शहरातील राज्यमंत्री गोविंददास कोन्थौजम यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी हिंसक आंदोलकांनी मंत्र्यांच्या घरातील फर्निचरसह मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

मंत्री गोविंददास कोन्थौजम यांना इम्फाळला जावे लागले, त्यामुळे ते घरी नव्हते. मात्र, आंदोलकांच्या हल्ल्यात कुटुंबातील सदस्य जखमी झालेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये मैतई आणि कुकी समुदायांमधील हिंसक संघर्षात सुमारे 70 लोकांचा मृत्यू झाला आणि 200 हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आणि गोंधळानंतर हजारो लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार