शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मणिपूर हिंसाचाराबद्दल सीएम बिरेन सिंह यांनी मागितली माफी, म्हणाले- 'जुन्या गोष्टी विसरून...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:21 IST

Manipur Violence : 'मी खरोखर खूप दुःखी आहे, मला माफ करा. आशा आहे नवीन वर्षात राज्यात शांतता पूर्ववत होईल.'

Manipur Violence : ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात 3 मे 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जखमी झाले आहेत. याबाबत आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या हिंसाचाराबद्दल राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, 'हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. राज्यात जे काही घडले, त्याबद्दल मी मणिपूरच्या जनतेची माफी मागतो. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले, अनेक लोक बेघर झाले, याबद्दल मी खूप दु:खी आहे.'

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, 'हे संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी गेले. 3 मे 2023 पासून आजपर्यंत राज्यातील जे काही घडले, त्याबद्दल मला जनतेची माफी मागायची आहे. मला खरच माफ करा. गेल्या 3-4 महिन्यांपासून राज्यात शांतता आहे. मला आशा आहे की, नवीन वर्षामध्ये राज्यात सामान्य स्थिती आणि शांतता पूर्ववत होईल. मी राज्यातील सर्व समाजाला आवाहन करू इच्छितो की, आपल्याला भूतकाळातील चुका विसरून नव्या आयुष्याला सुरुवात करावी लागेल. शांततापूर्ण मणिपूर, समृद्ध मणिपूरसाठी आपण सर्वांनी एकत्र राहायला हवे.'

बिरेन सिंह पुढे म्हणतात, 'आतापर्यंत हिंसाचारात सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला, तर 12 हजार 247 एफआयआर नोंदवण्यात आले. 625 आरोपींना अटकही झाली आहे. तर, सुमारे 5 हजार 600 शस्त्रे आणि स्फोटकांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. बेघर कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पुरेसे सुरक्षा कर्मचारी आणि पुरेसा पैसा उपलब्ध करून दिला आहे. विस्थापितांनाही नवीन घरे बांधून दिली जाणार आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचाराचा झाल्यापासून संवेदनशील जिल्ह्यांच्या सीमेवर केंद्रीय सैन्याच्या तैनातीनंतर गोळीबाराच्या घटना कमी झाल्या आहेत,' अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा