शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मणिपूर हिंसाचाराबद्दल सीएम बिरेन सिंह यांनी मागितली माफी, म्हणाले- 'जुन्या गोष्टी विसरून...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:21 IST

Manipur Violence : 'मी खरोखर खूप दुःखी आहे, मला माफ करा. आशा आहे नवीन वर्षात राज्यात शांतता पूर्ववत होईल.'

Manipur Violence : ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात 3 मे 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जखमी झाले आहेत. याबाबत आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या हिंसाचाराबद्दल राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, 'हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. राज्यात जे काही घडले, त्याबद्दल मी मणिपूरच्या जनतेची माफी मागतो. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले, अनेक लोक बेघर झाले, याबद्दल मी खूप दु:खी आहे.'

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, 'हे संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी गेले. 3 मे 2023 पासून आजपर्यंत राज्यातील जे काही घडले, त्याबद्दल मला जनतेची माफी मागायची आहे. मला खरच माफ करा. गेल्या 3-4 महिन्यांपासून राज्यात शांतता आहे. मला आशा आहे की, नवीन वर्षामध्ये राज्यात सामान्य स्थिती आणि शांतता पूर्ववत होईल. मी राज्यातील सर्व समाजाला आवाहन करू इच्छितो की, आपल्याला भूतकाळातील चुका विसरून नव्या आयुष्याला सुरुवात करावी लागेल. शांततापूर्ण मणिपूर, समृद्ध मणिपूरसाठी आपण सर्वांनी एकत्र राहायला हवे.'

बिरेन सिंह पुढे म्हणतात, 'आतापर्यंत हिंसाचारात सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला, तर 12 हजार 247 एफआयआर नोंदवण्यात आले. 625 आरोपींना अटकही झाली आहे. तर, सुमारे 5 हजार 600 शस्त्रे आणि स्फोटकांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. बेघर कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पुरेसे सुरक्षा कर्मचारी आणि पुरेसा पैसा उपलब्ध करून दिला आहे. विस्थापितांनाही नवीन घरे बांधून दिली जाणार आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचाराचा झाल्यापासून संवेदनशील जिल्ह्यांच्या सीमेवर केंद्रीय सैन्याच्या तैनातीनंतर गोळीबाराच्या घटना कमी झाल्या आहेत,' अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा