शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"बंगाल, बिहारमध्येही महिलांवर अत्याचार झाले, पण त्याची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 16:39 IST

काँग्रेसच्या चिदंबरम यांचा भाजपा आणि पंतप्रधान मोदींना सवाल

Manipur Violence P Chidambaram: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये एका नग्न महिलेची परेड केल्याचं प्रकरण चर्चेत आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मनात वेदना आणि राग दोन्ही आहे. कोणताही सुसंस्कृत समाज अशा घटना सहन करू शकत नाही. यासोबतच ते म्हणाले होते की, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड किंवा मणिपूरचे असो, या घटनांना आळा घालायचा आहे. मणिपूरच्या दोषींना सोडले जाणार नाही. पंतप्रधानांच्या या वाक्यावर काँग्रेस नेते आणि देशाचे माजी केंद्रीय मंत्री पी चिंदबरम यांनी आक्षेप घेतला. राजस्थान आणि छत्तीसगड आणि मणिपूर एकत्र बोलून पंतप्रधान नक्की काय सुचवू पाहत आहेत. बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये महिलांवरील हिंसाचार झाल्याचे मान्य केले तरी या राज्यांच्या घटनांची तुलना मणिपूर प्रकरणाशी होऊच शकत नाही.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर साधला निशाणा

पी चिदंबरम यांची ही टिप्पणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर आली. अनुराग ठाकूर म्हणाले होते की, काँग्रेस शासित राज्यांमध्येही महिलांविरोधात गंभीर गुन्हे घडले आहेत. मणिपूरच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते राजकारण करत आहेत, ही वेगळी बाब आहे. अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, राजस्थानमध्ये गेल्या चार वर्षांत महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. सुमारे एक लाख गुन्हे दाखल झाले. त्यातील सुमारे 33 हजार प्रकरणे महिलांवरील लैंगिक छळाशी संबंधित आहेत.

चिदंबरम यांनी दिलं उत्तर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थितीची बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानशी तुलना कशी करता येईल. या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार झाले हे मान्य करू पण त्याची तुलना मणिपूरशी करणं शक्य नाही. घाटी भागात कुकीज शिल्लक आहेत का? चुराचंदपूरमध्ये मेईतेई समुदायातील कोणी आहे का? जर अहवाल बरोबर असतील तर मणिपूरमध्ये जातीय शुद्धीकरण मोहीम पूर्ण झाली आहे, अशी रोखठोक मतही त्यांनी मांडले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारP. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीAnurag Thakurअनुराग ठाकुर