शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; जमावाला सुरक्षा यंत्रणांनी रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 22:55 IST

manipur violence update: मणिपूरची राजधानी गेल्या दोन दिवसांपासून धगधगू लागली आहे. जमावाने कालच भाजपाचे एक कार्यालय जाळले होते.

गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा उफाळून आला आहे. दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येवरून संतप्त झालेल्या जमावाने काही वेळापूर्वीच मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या घराकडे मोर्चा वळविला होता. बीरेन सिंह यांचे वडिलोपार्जित घर जाळण्याचा या जमावाचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. 

मणिपूरची राजधानी गेल्या दोन दिवसांपासून धगधगू लागली आहे. जमावाने कालच भाजपाचे एक कार्यालय जाळले होते. यानंतर आज पहाटे इंफाळच्या पश्चिम जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयात देखील तोडफोड करण्यात आली आहे. तसेच दुचाकींना आगी लावण्यात आल्या आहेत. 

बीरेन सिंह हे त्यांच्या घरी राहत नसून सरकारी निवासस्थानी राहतात, यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. इंफाळच्या हिंगांग भागात मुख्यमंत्र्यांचे वडिलोपार्जित घर आहे, त्याच्यावर आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे घर असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर फौजफाटा होता. यामुळे या जमावाला घरापासून १०० मीटर अंतरावरच रोखण्यात आले. यामुळे पुढील अनर्थ टळला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा