शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Manipur Violence : भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, जमावाने 15 घरं जाळली; तरुणाला घातल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 13:25 IST

Manipur Violence : इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात जमावाने 15 घरांना आग लावली. हिंसाचारात एका 45 वर्षीय व्यक्तीला गोळी लागली.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात जमावाने 15 घरांना आग लावली. हिंसाचारात एका 45 वर्षीय व्यक्तीला गोळी लागली. त्यांना तातडीने रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले. सध्या व्यक्तीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी लँगोल क्रीडा गावात घडली. 

माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान पोहोचले आणि जमावाने परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्या. रविवारी सकाळी परिस्थिती सुधारली, पण निर्बंध कायम आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील चेकोन भागातही हिंसाचार झाला आहे. आजूबाजूच्या तीन घरांनाही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

याआधी शुक्रवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यात मेईतेई समुदायाच्या तीन लोकांची हत्या करण्यात आली होती. नंतर कुकी समाजाच्या अनेक घरांनाही आग लावली. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, काही लोक बफर झोन ओलांडून मेईतेई भागात आले आणि त्यांनी मेईतेई भागात गोळीबार केला. सैन्याने बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा भागाच्या दोन किमी पलीकडे बफर झोन तयार केला आहे.

गुरुवारी संध्याकाळीही बिष्णुपूरमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार झाला, त्यानंतर परिसरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली. जमावाची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी चकमकही झाली. सुरक्षा दलांनी सात बेकायदेशीर बंकर उद्ध्वस्त केले. विष्णुपूर जिल्ह्यातील आणखी एका आयआरबी युनिटच्या चौक्यांवर जमावाने हल्ला केला आणि दारुगोळ्यासह अनेक शस्त्रे लुटली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार