शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

मणिपूर पेटलेले, ते संसदेत हसतात; राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; भारतीय सैन्य हिंसाचार थांबवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 05:44 IST

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरून केंद्र सरकारवर  टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यांपासून मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी संसदेत हसणे आणि विनोद करणे शोभणारे नाही.

काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे. केंद्र सरकारला हिंसाचार थांबवायचा असेल तर सरकारच्या हातात अशी साधने आहेत, जेणेकरून हिंसाचार थांबविता येईल. तिथे महिला आणि मुले मरत आहेत. महिलांची छेडछाड आणि अत्याचार होत आहेत आणि देशाचे पंतप्रधान संसदेच्या मध्यभागी बसून हसत आहेत. 

ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली हे वक्तव्य पोकळ  नव्हते. मी पंतप्रधानांना संसदेत २ तास बोलत, हसत, मस्करी करताना पाहिले. माझा भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक भारतीयाला माहीत आहे की, जर भारतीय सैन्याला हा हिंसाचार संपवायला सांगितले तर तो लगेच थांबेल.

राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे?मणिपूरच्या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यथित आहेत. राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे? युवतींवरील अत्याचाराची बाब संसदेत ऐकवावी? तीन महिन्यांपासून त्यांच्याकडे व्हिडीओ टेप होता, तर त्यांनी तो तपास यंत्रणांना का दिला नाही?, असे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी  ‘लोकमत’ला सांगितले. तो व्हिडीओ त्यांच्याकडे आधीच होता तर तो दाबून का ठेवला? तो तपास यंत्रणांकडे का दिला नाही? गिरिराज सिंह म्हणाले, खरे तर राहुल गांधी व काँग्रेसला मणिपूरमध्ये दोन मणिपूर करायचे आहेत. त्यांच्या मनात चोर आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी