शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

मणिपूर पेटलेले, ते संसदेत हसतात; राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; भारतीय सैन्य हिंसाचार थांबवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 05:44 IST

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरून केंद्र सरकारवर  टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यांपासून मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी संसदेत हसणे आणि विनोद करणे शोभणारे नाही.

काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे. केंद्र सरकारला हिंसाचार थांबवायचा असेल तर सरकारच्या हातात अशी साधने आहेत, जेणेकरून हिंसाचार थांबविता येईल. तिथे महिला आणि मुले मरत आहेत. महिलांची छेडछाड आणि अत्याचार होत आहेत आणि देशाचे पंतप्रधान संसदेच्या मध्यभागी बसून हसत आहेत. 

ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली हे वक्तव्य पोकळ  नव्हते. मी पंतप्रधानांना संसदेत २ तास बोलत, हसत, मस्करी करताना पाहिले. माझा भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक भारतीयाला माहीत आहे की, जर भारतीय सैन्याला हा हिंसाचार संपवायला सांगितले तर तो लगेच थांबेल.

राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे?मणिपूरच्या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यथित आहेत. राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे? युवतींवरील अत्याचाराची बाब संसदेत ऐकवावी? तीन महिन्यांपासून त्यांच्याकडे व्हिडीओ टेप होता, तर त्यांनी तो तपास यंत्रणांना का दिला नाही?, असे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी  ‘लोकमत’ला सांगितले. तो व्हिडीओ त्यांच्याकडे आधीच होता तर तो दाबून का ठेवला? तो तपास यंत्रणांकडे का दिला नाही? गिरिराज सिंह म्हणाले, खरे तर राहुल गांधी व काँग्रेसला मणिपूरमध्ये दोन मणिपूर करायचे आहेत. त्यांच्या मनात चोर आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी