शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मणिपूर पेटलेले, ते संसदेत हसतात; राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; भारतीय सैन्य हिंसाचार थांबवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 05:44 IST

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरून केंद्र सरकारवर  टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यांपासून मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी संसदेत हसणे आणि विनोद करणे शोभणारे नाही.

काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे. केंद्र सरकारला हिंसाचार थांबवायचा असेल तर सरकारच्या हातात अशी साधने आहेत, जेणेकरून हिंसाचार थांबविता येईल. तिथे महिला आणि मुले मरत आहेत. महिलांची छेडछाड आणि अत्याचार होत आहेत आणि देशाचे पंतप्रधान संसदेच्या मध्यभागी बसून हसत आहेत. 

ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली हे वक्तव्य पोकळ  नव्हते. मी पंतप्रधानांना संसदेत २ तास बोलत, हसत, मस्करी करताना पाहिले. माझा भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक भारतीयाला माहीत आहे की, जर भारतीय सैन्याला हा हिंसाचार संपवायला सांगितले तर तो लगेच थांबेल.

राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे?मणिपूरच्या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यथित आहेत. राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे? युवतींवरील अत्याचाराची बाब संसदेत ऐकवावी? तीन महिन्यांपासून त्यांच्याकडे व्हिडीओ टेप होता, तर त्यांनी तो तपास यंत्रणांना का दिला नाही?, असे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी  ‘लोकमत’ला सांगितले. तो व्हिडीओ त्यांच्याकडे आधीच होता तर तो दाबून का ठेवला? तो तपास यंत्रणांकडे का दिला नाही? गिरिराज सिंह म्हणाले, खरे तर राहुल गांधी व काँग्रेसला मणिपूरमध्ये दोन मणिपूर करायचे आहेत. त्यांच्या मनात चोर आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी