शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

मणिपूरमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू, पण मोबाइल इंटरनेट राहणार बंद; ‘या’ अटी पाळाव्याच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 19:16 IST

Manipur Violence: मणिपूर सरकारने ब्रॉडबँड इंटरनेट सेवेवरील निलंबन सशर्त मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ताशेरे ओढत राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यानंतर आता मणिपूरमधील ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी मोबाइल इंटरनेट मात्र बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर  ब्रॉडबँड सेवेवरील बंदी अंशतः उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन न केल्यास संबंधित नागरिकावर कारवाई केली जाणार आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाल्यापासून इंटरनेटवर बंदी घातलण्यात आली होती. यानंतर सुमारे ८० दिवसांनी मणिपूर सरकारने ब्रॉडबँड सेवा अटीशर्तींसह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मोबाईलच्या इंटरनेटवर अद्याप पूर्णपणे बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

मोबाइल इंटरनेटवरील बंदी कायम

संपूर्ण मणिपूरमध्ये मोबाइल इंटरनेटवर बंदी कायम राहणार आहे. मोबाइलवरुन सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती आणि अफा पसरवली जाते. अफवांपासून बचावासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी मोबाइल इंटरनेटवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे. 

मणिपूर सरकारच्या नेमक्या अटी काय?

मणिपूरमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरु करण्यात आली आहे. पण यासाठी अटी घालण्यात आल्या आहेत. या अटीचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. ब्रॉडबँड वापरासाठी स्टॅटिक आयपी अ‍ॅड्रेसचाच वापर करण्यात यावा. वायफाय हॉटस्पॉट वापरता येणार नाही. बंदी असलेल्या किंवा ब्लॉक केलेल्या सोशल मीडिया वेबसाइट्स तसेच व्हीपीएन वापरता येणार नाहीत. दररोज इंटरनेट लॉगिन क्रेडेन्शिअल्स बदलावे लागणार आहेत, अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, मणिपूरमधील चुरंदचंदपूर आणि फेरझॉल इथे २८ एप्रिलपासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ३ मे पासून संपूर्ण राज्यभरात इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर प्रत्येक पाच दिवसांनंतर ब्रॉडबँड आणि मोबाइल इंटरनेटवर बंदीचे आदेश काढण्यात आले होते. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारInternetइंटरनेटState Governmentराज्य सरकार