शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

मणिपूरच्या राज्यपालांच्या इशाऱ्याचा परिणाम, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं झाली सरकारजमा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 23:03 IST

Manipur News: जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे.

जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे. दरम्यान, मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यातील तुइबोंग गावामध्ये आसाम रायफल्सच्या जवानांसमोर १६ हत्यारे आणि दारुगोळा जमा केला. राज्यपाल अजय कुमारभल्ला यांनी दिलेल्या सक्त इशाऱ्यानंतर ही शस्त्रास्त्रं सरकारजमा झाली आहेत. अजय भल्ला यांनी जमावाने पोलिसांकडून लुटण्यात आलेली शस्त्रास्त्रे आणि अवैध शस्त्रास्त्रे सात दिवसांच्या आत जमा करण्याचे आवाहन केले होते.

आसाम रायाफल्सने याबाबत दिलेल्या माहितीनुसार आसाम रायफल्सने पोलीस, सीआरपीए, राज्य गुप्तचर संस्था आणि राज्य प्रशासनासोबत मिळून जोमी आणि कूकी समुदायांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या सुरक्षेविषयीच्या चिंता दूर करण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने सकारात्मक परिणामांवर भर देण्यात आला आहे.

संयुक्त सुरक्षा दलांनी आणि राज्य प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर, जोमी आणि कूकी समुदायाच्या नेत्यांनी स्थानिकांशी संपर्क साधला. तसेच २२ फेब्रुवारी रोजी चुराचांदपूर  जिल्ह्यातील तुईबोंग गावामध्ये स्वेच्छेने पहिला टप्प्यातील हत्यारं जमा केली. सरकारजमा करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये एक एम-१६ रायफल, एक ७.६२ मिलिमीचर एसएलआर, दोन एके रायफल्स, तीन इन्सास रायफल्स, दोन एम-७९ ग्रेनेड लॉन्चर आणि अन्य हत्यारांचा समावेश आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार