शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

मणिपूरच्या राज्यपालांच्या इशाऱ्याचा परिणाम, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं झाली सरकारजमा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 23:03 IST

Manipur News: जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे.

जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे. दरम्यान, मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यातील तुइबोंग गावामध्ये आसाम रायफल्सच्या जवानांसमोर १६ हत्यारे आणि दारुगोळा जमा केला. राज्यपाल अजय कुमारभल्ला यांनी दिलेल्या सक्त इशाऱ्यानंतर ही शस्त्रास्त्रं सरकारजमा झाली आहेत. अजय भल्ला यांनी जमावाने पोलिसांकडून लुटण्यात आलेली शस्त्रास्त्रे आणि अवैध शस्त्रास्त्रे सात दिवसांच्या आत जमा करण्याचे आवाहन केले होते.

आसाम रायाफल्सने याबाबत दिलेल्या माहितीनुसार आसाम रायफल्सने पोलीस, सीआरपीए, राज्य गुप्तचर संस्था आणि राज्य प्रशासनासोबत मिळून जोमी आणि कूकी समुदायांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या सुरक्षेविषयीच्या चिंता दूर करण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने सकारात्मक परिणामांवर भर देण्यात आला आहे.

संयुक्त सुरक्षा दलांनी आणि राज्य प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर, जोमी आणि कूकी समुदायाच्या नेत्यांनी स्थानिकांशी संपर्क साधला. तसेच २२ फेब्रुवारी रोजी चुराचांदपूर  जिल्ह्यातील तुईबोंग गावामध्ये स्वेच्छेने पहिला टप्प्यातील हत्यारं जमा केली. सरकारजमा करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये एक एम-१६ रायफल, एक ७.६२ मिलिमीचर एसएलआर, दोन एके रायफल्स, तीन इन्सास रायफल्स, दोन एम-७९ ग्रेनेड लॉन्चर आणि अन्य हत्यारांचा समावेश आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार