शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:19 IST

संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.

बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवारी येथे प्रारंभ झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या सभेचे उद्घाटन केले. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी होसबळे यांनी मांडलेल्या वार्षिक अहवालात मणिपूरसह उत्तर-दक्षिण भेद, बांगलादेशातील हिंदूंची स्थिती आणि महाकुंभची यशस्वी सांगता या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

 संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.

संघाच्या कार्याची शताब्दीयंदाच्या विजयादशमीला संघाच्या कार्याची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या दृष्टीने २०२५-२६ शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, त्याची रूपरेषा या सभेत तयार केली जाणार आहे.

डॉ. मनमोहनसिंग, हुसेन यांना श्रद्धांजलीसह सरकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी पहिल्या दिवशीचे सत्र पार पडल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना शुक्रवारी प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, प्रीतीश नंदी, एस. एम. कृष्णा, राम जन्मभूमीचे ट्रस्टी कामेश्वर चौपाल, तुलसी गौडा, शंकर तत्ववादी आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे सांगितले.

मणिपूरमध्ये परिस्थिती सुधारतेयसहसरकार्यवाह मुकुंद यांनी मणिपूरमध्ये २० महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर वार्षिक अहवालात असलेल्या उल्लेखांवर भाष्य केले. ही स्थिती असली तरी केंद्र सरकार आणि मणिपूरच्या जनतेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कार्यामुळे खूप मोठी आशा निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

मातृभाषेतील शिक्षणालाच महत्त्वभाषेच्या निमित्ताने उत्तर-दक्षिण वाद वाढवण्याचे प्रयत्न राजकारणात होत आहेत. मात्र रा. स्व. संघ प्रादेशिक भाषांनाच महत्त्व देतो. मातृभाषेतील शिक्षणालाच संघाने महत्त्व दिले असल्याचे मुकुंद यांनी नमूद केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBengaluruबेंगळूर