शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:19 IST

संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.

बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवारी येथे प्रारंभ झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या सभेचे उद्घाटन केले. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी होसबळे यांनी मांडलेल्या वार्षिक अहवालात मणिपूरसह उत्तर-दक्षिण भेद, बांगलादेशातील हिंदूंची स्थिती आणि महाकुंभची यशस्वी सांगता या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

 संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.

संघाच्या कार्याची शताब्दीयंदाच्या विजयादशमीला संघाच्या कार्याची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या दृष्टीने २०२५-२६ शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, त्याची रूपरेषा या सभेत तयार केली जाणार आहे.

डॉ. मनमोहनसिंग, हुसेन यांना श्रद्धांजलीसह सरकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी पहिल्या दिवशीचे सत्र पार पडल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना शुक्रवारी प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, प्रीतीश नंदी, एस. एम. कृष्णा, राम जन्मभूमीचे ट्रस्टी कामेश्वर चौपाल, तुलसी गौडा, शंकर तत्ववादी आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे सांगितले.

मणिपूरमध्ये परिस्थिती सुधारतेयसहसरकार्यवाह मुकुंद यांनी मणिपूरमध्ये २० महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर वार्षिक अहवालात असलेल्या उल्लेखांवर भाष्य केले. ही स्थिती असली तरी केंद्र सरकार आणि मणिपूरच्या जनतेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कार्यामुळे खूप मोठी आशा निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

मातृभाषेतील शिक्षणालाच महत्त्वभाषेच्या निमित्ताने उत्तर-दक्षिण वाद वाढवण्याचे प्रयत्न राजकारणात होत आहेत. मात्र रा. स्व. संघ प्रादेशिक भाषांनाच महत्त्व देतो. मातृभाषेतील शिक्षणालाच संघाने महत्त्व दिले असल्याचे मुकुंद यांनी नमूद केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBengaluruबेंगळूर