शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Tripura Election 2018 : सलग 20 वर्षे डाव्यांची गढी अभेद्य ठेवणारे माणिक सरकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 10:06 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे सत्तेत आहे. त्यातील २० वर्षे मुख्यमंत्रीपदी माणिक सरकार आहेत. माणिक सरकार यांनी १९९८ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

मुंबई- मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे सत्तेत आहे. त्यातील २० वर्षे मुख्यमंत्रीपदी माणिक सरकार आहेत. माणिक सरकार यांनी १९९८ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. १९९३ ते १९९८ या पाच वर्षांसाठी दशरथ देव मुख्यमंत्री होते. देव यांच्याकडून माणिक सरकार यांनी सूत्रे स्वीकारली. भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. आताही मतमोजणीच्या पहिल्या फेरीमध्ये माणिक सरकार त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्रिपुरासाठी भाजपाने शर्थीचे प्रयत्न केले असले तरी माणिक सरकार यांचे आव्हानही तितकेच तगडे आहे. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माणिक सरकार यांना महिन्याला केवळ 5 हजार रुपये पक्षाकडून मिळतात. माणिक सरकार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरताना आपल्याकडे सध्या  1,520 रुपये असून राष्ट्रीयकृत बँकेत 2,410 रूपये आहेत तसेच इतर कोणत्याही बँकेत आपले खाते नाही असे जाहीर केले आहे. नगरसेवक आमदारांची संपत्ती पाहिल्यावर आजकाल कोट्यवधींचे आकडे समोर येतात. अशा स्थितीत एका मुख्यमंत्र्याची इतकी साधी राहणी नक्कीच विचार करायला लावणारी आहे.

सरकार यांच्याकडे कोणतीही लागवडयोग्य जमिन किंवा घर नसल्याचे त्यांनी नामांकनपत्र भरताना लिहिले आहे, तसेच ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात राहात आहेत. माणिक सरकार यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य या निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे रोख 20,140 रुपये असून तसेच त्यांचे दोन बँक खात्यांमध्ये 1 लाख 24 हजार 101 आणि 86 हजार 473.78 रुपये असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच 2 लाख, 5 लाख आणि 2.25 लाख अशा त्यांच्या तीन कायम ठेवी आहेत व 20 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत.

पांचाली भट्टाचार्य यांच्याकडे 888.25 स्क्वे .फूट मालकीचा भूखंड असून त्यावर बांधकाम करण्यासाठी त्यांनी आजवर 15 लाख रुपये खर्च केले आहेत. त्या एकूण मालमत्तेची किंमत 21 लाख आहे. पांचाली यांनी शेवटचा कर परतावा 2011-12 साली भरला होता. तेव्हा त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न 4 लाख 49 हतार 770 इतके जाहीर केले होते, त्यानंतर त्यांनी आयकर परतावा भरलेला नाही.

टॅग्स :Manik Sarkarमाणिक सरकार