शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Tripura Election 2018 : सलग 20 वर्षे डाव्यांची गढी अभेद्य ठेवणारे माणिक सरकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 10:06 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे सत्तेत आहे. त्यातील २० वर्षे मुख्यमंत्रीपदी माणिक सरकार आहेत. माणिक सरकार यांनी १९९८ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

मुंबई- मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे सत्तेत आहे. त्यातील २० वर्षे मुख्यमंत्रीपदी माणिक सरकार आहेत. माणिक सरकार यांनी १९९८ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. १९९३ ते १९९८ या पाच वर्षांसाठी दशरथ देव मुख्यमंत्री होते. देव यांच्याकडून माणिक सरकार यांनी सूत्रे स्वीकारली. भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. आताही मतमोजणीच्या पहिल्या फेरीमध्ये माणिक सरकार त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्रिपुरासाठी भाजपाने शर्थीचे प्रयत्न केले असले तरी माणिक सरकार यांचे आव्हानही तितकेच तगडे आहे. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माणिक सरकार यांना महिन्याला केवळ 5 हजार रुपये पक्षाकडून मिळतात. माणिक सरकार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरताना आपल्याकडे सध्या  1,520 रुपये असून राष्ट्रीयकृत बँकेत 2,410 रूपये आहेत तसेच इतर कोणत्याही बँकेत आपले खाते नाही असे जाहीर केले आहे. नगरसेवक आमदारांची संपत्ती पाहिल्यावर आजकाल कोट्यवधींचे आकडे समोर येतात. अशा स्थितीत एका मुख्यमंत्र्याची इतकी साधी राहणी नक्कीच विचार करायला लावणारी आहे.

सरकार यांच्याकडे कोणतीही लागवडयोग्य जमिन किंवा घर नसल्याचे त्यांनी नामांकनपत्र भरताना लिहिले आहे, तसेच ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात राहात आहेत. माणिक सरकार यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य या निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे रोख 20,140 रुपये असून तसेच त्यांचे दोन बँक खात्यांमध्ये 1 लाख 24 हजार 101 आणि 86 हजार 473.78 रुपये असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच 2 लाख, 5 लाख आणि 2.25 लाख अशा त्यांच्या तीन कायम ठेवी आहेत व 20 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत.

पांचाली भट्टाचार्य यांच्याकडे 888.25 स्क्वे .फूट मालकीचा भूखंड असून त्यावर बांधकाम करण्यासाठी त्यांनी आजवर 15 लाख रुपये खर्च केले आहेत. त्या एकूण मालमत्तेची किंमत 21 लाख आहे. पांचाली यांनी शेवटचा कर परतावा 2011-12 साली भरला होता. तेव्हा त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न 4 लाख 49 हतार 770 इतके जाहीर केले होते, त्यानंतर त्यांनी आयकर परतावा भरलेला नाही.

टॅग्स :Manik Sarkarमाणिक सरकार