शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसमधून केलं निलंबित, मोदींबद्दलचं वादग्रस्त विधान भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 22:54 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. तसेच निलंबित करत असताना काँग्रेस पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मणिशंकर अय्यर यांनी असंसदीय अशा 'नीच' या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर आरजेडीच्या लालूप्रसाद यादवांपासून काँग्रेसच्या नेत्यांची टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानापासून हात झटकत त्यांना खडे बोल सुनावले होते.भाजपासारखी पातळी सोडून टीका करणं ही काँग्रेसची संस्कृती नाही. मणिशंकर यांनी वापरलेल्या असंसदीय भाषेबाबत त्यांना माफी मागायला हवी, असं म्हणत राहुल गांधी यांनी मणिशंकर यांना सुनावले होते. त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनीही माफी मागितली होती. मणिशंकर यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे. 'मोदीजी, तुम्ही अशा प्रकारचं धाडस दाखवू शकाल का?', असा सवालही काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेस  नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या समर्थनार्थ नेहमीच बोलणा-या लालूंनी काँग्रेस नेत्यालाच लक्ष्य केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अय्यर यांनी मोदींना नीच असं संबोधल्यानंतर लालूंनी त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं सांगितलं आहे. पाटण्यात पत्रकारांनी छेडले असता लालूप्रसाद यादव यांनी हे विधान केलं आहे.परंतु मणिशंकर अय्यर यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचंही लालूंनी सांगितलं आहे. मोदींनी उचकवल्यामुळेच मणिशंकर अय्यर यांनी हा शब्द उच्चारल्याचंही लालू म्हणाले आहेत. या देशात राजनैतिक मर्यादा, भाषा व व्याकरण फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीच्या नजरेतून पाहिलं जातंय, असं म्हणत लालूंनी मोदींवरही निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस