शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

मँगो मॅनचा कोविड योद्ध्यांना अनोखा सलाम, पद्मश्री खान चाचांच्या नर्सरीत 'मोदी आम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:24 IST

मँगो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमील उल्लाह खान यांनी आपल्या आंब्याच्या बागेतील आंब्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची नावे दिली आहेत. कोविडच्या काळात अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.

ठळक मुद्देकलीम उल्लाह खान यांनी यासोबत देशाचं नाव मोठं करणाऱ्या आणि असामान्य कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दिग्गजांचीही नावे काही आंब्यांना दिली आहेत. या आंब्यांच्या प्रजातीमध्ये मोदी आंबा हीही नवी प्रजाती त्यांनी विकसीत केली आहे

लखनौ - कोरोना महामारीच्या संकटात गेल्या 1 वर्षांपेक्षा जास्त काळ फ्रंटलाईन वर्कर्स आपली सेवा देत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी, पत्रकार यांसह अनेकजण कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेनं उतरले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या लढाईत ते सर्वात पुढे आहेत. मँगो मॅन पद्मश्री हाज कमील उल्लाह खान यांनी या सर्व कोविड योद्ध्यांच्या कार्याला वेगळ्याच पद्धतीने सलाम केलाय. 

मँगो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमील उल्लाह खान यांनी आपल्या आंब्याच्या बागेतील आंब्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची नावे दिली आहेत. कोविडच्या काळात अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे, आपल्या नर्सरीत डॉक्टर्स आंबा नावाने आंब्यांची प्रजाती निर्माण केली आहे. तसेच, पोलिसांच्या बाबतीतही आहे, त्यामुळे पोलीस आंबा नावानेही आंब्याची नवीन प्रजाती निर्माण केली आहे. त्यामुळे, कोविड काळात बलिदान देणाऱ्यांचे स्मरण लोकांना होईल आणि या आंब्यांच्या प्रजातीतून ते जिवंत राहतील, असे कलीम उल्लाह खान यांनी म्हटलंय. 

कलीम उल्लाह खान यांनी यासोबत देशाचं नाव मोठं करणाऱ्या आणि असामान्य कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दिग्गजांचीही नावे काही आंब्यांना दिली आहेत. या आंब्यांच्या प्रजातीमध्ये मोदी आंबा हीही नवी प्रजाती त्यांनी विकसीत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने देशाला एक मोठी उंची प्राप्त करुन दिलीय. त्यामुळेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं महत्त्व वाढलं आहे. मोदींप्रमाणेच योगी आदित्यनाथ हेही तब्बल 18 तास काम करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही या लढ्यात सातत्याने आपलं योगदान देत आहेत. त्यासोबतच, तरुण नेते म्हणून अखिलेश यादव यांनीही चांगल काम केलंय. तर, जगतसुंदरी असलेल्या ऐश्वर्या राय यांच्याही नावाने आपण आंब्याचं वाण बनविल्याचं खान चाचांनी सांगितलं.  

२००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

बागायत शेतीचे तज्ज्ञ असणाऱ्या खान हे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीतून आठ एकर जमिनीमध्ये १६०० वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या वाणांचे उत्पादन घेतात. उत्तर प्रदेशमधील महिलाबाद येथे खान कुटुंबाच्या २० एकर जमिनीवर आंब्याच्या बागा आहेत. त्यापैकी ८ एकरावर कलीमुल्लाह हे आंब्याची नवीन नवीन कलम तयार करुन प्रयोग करत असतात. त्यांनी कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफ्टींगच्या माध्यमातून एकाच झाडावर ३०० प्रकराच्या आंब्यांचे उत्पादन घेतलं होतं. आंबा संशोधन आणि बागायती शेतीमधील प्रयोगशिलतेसाठी त्यांना २००८ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीlucknow-pcलखनऊpadma shri awardsपद्मश्री पुरस्कारMangoआंबा