शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

मँगो मॅनचा कोविड योद्ध्यांना अनोखा सलाम, पद्मश्री खान चाचांच्या नर्सरीत 'मोदी आम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:24 IST

मँगो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमील उल्लाह खान यांनी आपल्या आंब्याच्या बागेतील आंब्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची नावे दिली आहेत. कोविडच्या काळात अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.

ठळक मुद्देकलीम उल्लाह खान यांनी यासोबत देशाचं नाव मोठं करणाऱ्या आणि असामान्य कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दिग्गजांचीही नावे काही आंब्यांना दिली आहेत. या आंब्यांच्या प्रजातीमध्ये मोदी आंबा हीही नवी प्रजाती त्यांनी विकसीत केली आहे

लखनौ - कोरोना महामारीच्या संकटात गेल्या 1 वर्षांपेक्षा जास्त काळ फ्रंटलाईन वर्कर्स आपली सेवा देत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी, पत्रकार यांसह अनेकजण कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेनं उतरले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या लढाईत ते सर्वात पुढे आहेत. मँगो मॅन पद्मश्री हाज कमील उल्लाह खान यांनी या सर्व कोविड योद्ध्यांच्या कार्याला वेगळ्याच पद्धतीने सलाम केलाय. 

मँगो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमील उल्लाह खान यांनी आपल्या आंब्याच्या बागेतील आंब्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची नावे दिली आहेत. कोविडच्या काळात अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे, आपल्या नर्सरीत डॉक्टर्स आंबा नावाने आंब्यांची प्रजाती निर्माण केली आहे. तसेच, पोलिसांच्या बाबतीतही आहे, त्यामुळे पोलीस आंबा नावानेही आंब्याची नवीन प्रजाती निर्माण केली आहे. त्यामुळे, कोविड काळात बलिदान देणाऱ्यांचे स्मरण लोकांना होईल आणि या आंब्यांच्या प्रजातीतून ते जिवंत राहतील, असे कलीम उल्लाह खान यांनी म्हटलंय. 

कलीम उल्लाह खान यांनी यासोबत देशाचं नाव मोठं करणाऱ्या आणि असामान्य कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दिग्गजांचीही नावे काही आंब्यांना दिली आहेत. या आंब्यांच्या प्रजातीमध्ये मोदी आंबा हीही नवी प्रजाती त्यांनी विकसीत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने देशाला एक मोठी उंची प्राप्त करुन दिलीय. त्यामुळेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं महत्त्व वाढलं आहे. मोदींप्रमाणेच योगी आदित्यनाथ हेही तब्बल 18 तास काम करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही या लढ्यात सातत्याने आपलं योगदान देत आहेत. त्यासोबतच, तरुण नेते म्हणून अखिलेश यादव यांनीही चांगल काम केलंय. तर, जगतसुंदरी असलेल्या ऐश्वर्या राय यांच्याही नावाने आपण आंब्याचं वाण बनविल्याचं खान चाचांनी सांगितलं.  

२००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

बागायत शेतीचे तज्ज्ञ असणाऱ्या खान हे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीतून आठ एकर जमिनीमध्ये १६०० वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या वाणांचे उत्पादन घेतात. उत्तर प्रदेशमधील महिलाबाद येथे खान कुटुंबाच्या २० एकर जमिनीवर आंब्याच्या बागा आहेत. त्यापैकी ८ एकरावर कलीमुल्लाह हे आंब्याची नवीन नवीन कलम तयार करुन प्रयोग करत असतात. त्यांनी कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफ्टींगच्या माध्यमातून एकाच झाडावर ३०० प्रकराच्या आंब्यांचे उत्पादन घेतलं होतं. आंबा संशोधन आणि बागायती शेतीमधील प्रयोगशिलतेसाठी त्यांना २००८ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीlucknow-pcलखनऊpadma shri awardsपद्मश्री पुरस्कारMangoआंबा