शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

ऐन हंगामात आंबा महागला!

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

मार्चचा शेवटचा पंधरवडा व एप्रिलच्या सुरुवातीला देशभरात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळांच्या राजा आंब्याला मोठा तडाखा बसला आहे.

नवी दिल्ली : मार्चचा शेवटचा पंधरवडा व एप्रिलच्या सुरुवातीला देशभरात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळांच्या राजा आंब्याला मोठा तडाखा बसला आहे. देशातील प्रमुख आंबा उत्पादक राज्यांत जवळपास ५० टक्के पीक वाया गेले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आंब्याच्या दरात सुमारे ६० टक्के वाढ झाली आहे. ‘असोचेम’ने (असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री आॅफ इंडिया) गारपीट व अवकाळी पावसाने आंब्याचे झालेले नुकसान व त्याचा निर्यातीवर झालेल्या परिणामाचा अभ्यास केला. त्यात हापूस आंब्याचा दर डझनामागे ५०० ते ६०० रुपये झाल्याचे त्यांना आढळले, तर इतर स्थानिक आंब्याला किलोमागे १०० रुपये मोजावे लागत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. ही दरवाढ ६० टक्क्यांच्या घरात आहे. भारतात उत्तर प्रदेशामध्ये आंब्याचे मोठे उत्पादन होते. अवकाळी पावसाने तेथील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातही नैसर्गिक आपत्तीने हापूस आंब्यासह विदर्भ व मराठवाड्यातील पिकाचे नुकसान झाल्याचे ‘असोचेम’च्या अहवालात म्हटले आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक व बिहार राज्यांतही आंब्याला फटका बसला आहे. संबंधित राज्य सरकारांनी आंबा उत्पादकांना नुकसानभरपाई जाहीर केली आहे. मात्र, ती पुरेशी नसल्याचे ‘असोचेम’चे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी सांगितले. कमी उत्पादनामुळे साहजिकच निर्यातीवरही परिणाम झाला असून यावर्षी भारतातून खूपच कमी म्हणजे फक्त ४१ हजार २८० टन आंब्याची निर्यात होणे अपेक्षित आहे. त्याचवेळी केवळ १० लाख टन उत्पादन होणाऱ्या पाकिस्तानातून ४० हजार टन आंब्याची निर्यात होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)४भारतातून संयुक्त अरब अमिरातीत एकूण निर्यातीच्या जवळपास ६१ टक्के निर्यात होते. त्यानंतर युनायटेड किंगडम (१२ टक्के), सौदी अरेबियात (५ टक्के) भारतीय आंबा निर्यात केला जातो. गेल्या काही वर्षांत भारतातून कतार, अमेरिका, ओमान, कुवेत या देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीतही मोठी वाढ नोंदविली गेली आहे.