शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

"भारतातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्यात आमिर खानसारख्या लोकांचा हात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 21:24 IST

भाजप खासदार सुधीर गुप्ता यांचं वादग्रस्त विधान

मंदसौर: जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरणाची घोषणा केली आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीदेखील लवकरच लोकसंख्या नियंत्रण धोरण लागू करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर आता मध्य प्रदेशातील मंदसौरचे भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. भारतातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्यात आमिर खानसारख्या लोकांचा हात असल्याचं गुप्ता यांनी म्हटलं आहे.

देशाची लोकसंख्या अनियंत्रित होण्यात आमिर खानसारख्या लोकांचं हात आहे आणि हे देशाचं दुर्दैव आहे, असं गुप्ता म्हणाले. 'आमिर खानला पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दुसरी पत्नी किरण राव मुलांसोबत कुठे भटकणार याची चिंता नाही. पण आमिरनं तिसरीचा शोध सुरू केला आहे. एका हिरोचा हा संदेश आहे का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

२०३० पर्यंत लोकसंख्या नियंत्रण धोरणाची अंमलबजावणीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०२१ ते २०३० कालावधीसाठी लोकसंख्या धोरण लागू केली आहे. 'गरिबी आणि अपुऱ्या शिक्षणामुळे लोकसंख्या वाढते. काही समुदायांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. नवं लोकसंख्या धोरण २०३० पर्यंत लागू असेल,' असं योगी आदित्यनाथ नव्या धोरणाची घोषणा करताना म्हणाले.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानBJPभाजपा