शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

"सैन्यात असताना गोळ्यांची कधी भीती वाटली नाही पण आता घरात राहायची भीती वाटतेय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 10:30 IST

सरकाघाटातील रोपर्डीजवळील कंदौल गावात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. सरकाघाटातील सैनिकांच्या गावाचा प्रशासनाला विसर पडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. राज्यातील मंडी जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. मंडी जिल्ह्य़ातील सरकाघाट येथील पटडीघाट येथे डोंगराला तडे गेले आहेत. दुसरीकडे सरकाघाटातील रोपर्डीजवळील कंदौल गावात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. सरकाघाटातील सैनिकांच्या गावाचा प्रशासनाला विसर पडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

कंदौल गावातील 64 वर्षीय माजी सैनिक नारायण दत्त यांच्यावरही पावसामुळे आपत्ती ओढवली आहे. आयुष्यभराची कमाई त्यांनी घरासाठी खर्च केली. आता घर कोसळण्याच्या मार्गावर आहे. घराला भेगा पडल्या आहेत. 6 दिवसांपासून त्रासलेले, माजी सैनिक नारायण दत्त यांनी सांगितले की त्यांनी 35 वर्षे सैन्यात सेवा केली. डोगरा रेजिमेंटमध्ये राहिले. जम्मू-काश्मीर आणि सियाचीन ग्लेशियरमध्येही सेवा केली आहे. त्यांनी सांगितले की कंदौल गावात प्रत्येक घरात एक सैनिक आहे. 

सियाचीनमध्ये कर्तव्य पार पाडत असताना कोणतीही भीती नसल्याचं नारायण दत्त यांनी सांगितलं. गोळ्यांची कधी भीती वाटली नाही. मात्र आता या आपत्तीची भीती वाटत आहे. सहा दिवस दिव्याच्या प्रकाशात जगतो आहोत. प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने गावाची स्थिती काय आहे, याबाबत विचारणा केली नाही. नेत्यांनीही गावाची दखल घेतली नाही. राजकारणी मतं गोळा करायला येतात, असेही गावातील इतर लोक सांगतात. पण आता कोणी विचारायला येत नाही. 

पाटी गावात अनेक घरांवर दगड पडण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत लोक तंबूत राहत आहेत. यासोबतच घरांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत. सरकाघाटापासून गावाचे अंतर 15 किमी आहे. सध्या लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. गावातील तरुणांनीही मुख्य रस्त्याची स्वत: स्वच्छता केली आहे. पावसामुळे गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊस