शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

"सैन्यात असताना गोळ्यांची कधी भीती वाटली नाही पण आता घरात राहायची भीती वाटतेय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 10:30 IST

सरकाघाटातील रोपर्डीजवळील कंदौल गावात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. सरकाघाटातील सैनिकांच्या गावाचा प्रशासनाला विसर पडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. राज्यातील मंडी जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. मंडी जिल्ह्य़ातील सरकाघाट येथील पटडीघाट येथे डोंगराला तडे गेले आहेत. दुसरीकडे सरकाघाटातील रोपर्डीजवळील कंदौल गावात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. सरकाघाटातील सैनिकांच्या गावाचा प्रशासनाला विसर पडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

कंदौल गावातील 64 वर्षीय माजी सैनिक नारायण दत्त यांच्यावरही पावसामुळे आपत्ती ओढवली आहे. आयुष्यभराची कमाई त्यांनी घरासाठी खर्च केली. आता घर कोसळण्याच्या मार्गावर आहे. घराला भेगा पडल्या आहेत. 6 दिवसांपासून त्रासलेले, माजी सैनिक नारायण दत्त यांनी सांगितले की त्यांनी 35 वर्षे सैन्यात सेवा केली. डोगरा रेजिमेंटमध्ये राहिले. जम्मू-काश्मीर आणि सियाचीन ग्लेशियरमध्येही सेवा केली आहे. त्यांनी सांगितले की कंदौल गावात प्रत्येक घरात एक सैनिक आहे. 

सियाचीनमध्ये कर्तव्य पार पाडत असताना कोणतीही भीती नसल्याचं नारायण दत्त यांनी सांगितलं. गोळ्यांची कधी भीती वाटली नाही. मात्र आता या आपत्तीची भीती वाटत आहे. सहा दिवस दिव्याच्या प्रकाशात जगतो आहोत. प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने गावाची स्थिती काय आहे, याबाबत विचारणा केली नाही. नेत्यांनीही गावाची दखल घेतली नाही. राजकारणी मतं गोळा करायला येतात, असेही गावातील इतर लोक सांगतात. पण आता कोणी विचारायला येत नाही. 

पाटी गावात अनेक घरांवर दगड पडण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत लोक तंबूत राहत आहेत. यासोबतच घरांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत. सरकाघाटापासून गावाचे अंतर 15 किमी आहे. सध्या लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. गावातील तरुणांनीही मुख्य रस्त्याची स्वत: स्वच्छता केली आहे. पावसामुळे गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊस